शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलच्या वापरामुळे गोव्यात 280 वाहन चालकांचे परवाने निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 16:02 IST

धावत्या वाहनांवरुन मोबाईलचा वापर करण्याचे फॅड गोव्यात वाढले असून या प्रकारावर अंकुश आणण्यासाठी आता वाहतूक पोलिसही सतर्क झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात गोव्यात अशाप्रकारचे 2225 गुन्हे नोंद झाले

ठळक मुद्देगोव्यात पहिल्या 9 महिन्यात 2225 जणांकडून चालत्या वाहनांवर मोबाईल वापरण्याचा गुन्हा ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 र्पयत 87 जणांचे परवाने निलंबितयावर्षीच्या शेवटच्या तीन महिन्यात गुन्हय़ांची संख्या अधिकच वाढण्याची शक्यता

 मडगाव - धावत्या वाहनांवरुन मोबाईलचा वापर करण्याचे फॅड गोव्यात वाढले असून या प्रकारावर अंकुश आणण्यासाठी आता वाहतूक पोलिसही सतर्क झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात गोव्यात अशाप्रकारचे 2225 गुन्हे नोंद झाले असून आतार्पयत 280 वाहन चालकांचे वाहन परवाने तात्पुरत्या काळासाठी निलंबित  करण्यात आले आहेत.

चालत्या वाहनांवरुन मोबाईलचा वापर केल्यास वाहन चालकाला दंड आकारण्याबरोबरच तीन महिन्यासाठी त्याचा वाहन परवाना निलंबित  करण्याची तजवीज कायद्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीचा आदेश देऊन कित्येक काळ लोटला तरी गोव्यात ऑक्टोबर 2016 पासूनच ही पध्दत सुरु केली आहे. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत अशाप्रकारचे 775 गुन्हे नोंद झाले होते आणि त्यात 87 वाहन चालकांचे परवाने निलंबित  करण्यात आले होते. यंदा पहिल्या 9 महिन्यात 280 जणांचे परवाने निलंबित  करण्यात आले आहेत. जुलै 1 ते सप्टेंबर 30, 2017 या शेवटच्या तीन महिन्यात अशाप्रकारचे 977 गुन्हे नोंद झाले आहेत व 117 जणांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अशाप्रकारच्या गुन्हय़ासाठी दंडाचीही तरतूद असून खासगी वाहन चालकांसाठी 600 रुपये तर सार्वजनिक वाहन चालकांसाठी 700 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. वाहतूक पोलीस व वाहतूक खाते या दोघांनीही मोहीम कडक केली असली तरी गुन्हय़ांचे प्रमाण नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच असल्याचे आतार्पयतच्या प्रकरणावरुन निदर्शनास आले आहे.वाहतूक पोलीस विभागाचे उपअधिक्षक धर्मेश आंगले यांनी या वाढत्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करताना, आता वाहन चालकांमध्येच शिस्त येण्याची गरज व्यक्त केली. केवळ पोलीस बघतात म्हणून अशाप्रकारचे गुन्हे न करता मुळातच जबाबदारीने वाहन चालवून गुन्हे होणार नाहीत याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या शेवटच्या तीन महिन्यात गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे या शेवटच्या तीन महिन्याच्या कालावधीत हे प्रमाण अधिक वाढणार आहे त्यामुळे आम्हीही अधिक सतर्कता बाळगणार असे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवा