शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

'राजभाषा व्हायला आधी मराठी जगली तर पाहिजे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:56 IST

मराठी राजभाषा होण्याकरिता आधी राजकर्त्यांच्या मनात मराठी विषयी प्रेम असले पाहिजे

पणजी: मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा असे संदेश गोवा मराठी अकादमीला काहीजण पाठवतात. राजभाषा होणे ही वेगळी व नंतरची गोष्ट आहे. सध्या मराठीला वाचविण्याचे कार्य पुढे नेणे गरजेचे आहे. मराठी वाचली तरच ती राजभाषा होईल, हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे असे निरीक्षण मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी नोंदविले. तरूणांची नस समजून घेऊन त्यांना मराठीकडे वळविणे व त्यांना व्यासपीठ मिळवून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.सोमवारी येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात, गोमंतक साहित्य सेवक मंडळ व मिनेझीस ब्रागांझा संस्थतर्फे आयोजित केलेल्या जेष्ठ समिक्षकत सोमनाथ कोमरपंत यांच्या गोमंतक: प्रज्ञा आणि प्रतिभा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर लेखक प्रा. नारायण महाले, जेष्ठ पत्रकार परेश प्रभू, डॉ. सोमनाथ कोमरपंत, मिनेझीस ब्रागांझा संस्थेचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर व गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वसकर उपस्थित होते. मराठी राजभाषा होण्याकरिता आधी राजकर्त्यांच्या मनात मराठी विषयी प्रेम असले पाहिजे व हे प्रेम प्रजेच्या वतीने निर्माणजाले पाहिजे. सध्या मराठी प्रथामीक शाळाच जर बंद पडत आहेत तर त्यात मराठी करी संरक्षित राहणार असा प्रश्न निर्माण झाला असून पालकांचे प्रबोधन आदी कामे सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. मराठीला पोर्तुगीजांनी संपविण्याचे षडयंत्र रचले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आपलीच माणसे मराठी संपविण्याचे प्रयत्न करत असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :marathiमराठीMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018