शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

अंदाज बांधल्याप्रमाणे भोम ग्रामसभेत वादळ घोंघावलेच 

By आप्पा बुवा | Updated: November 26, 2023 17:21 IST

रविवारी सकाळी सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू होताच वेगवेगळ्या विषयावरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाल धारेवर धरायला सुरुवात केली होती.

फोंडा - राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्पावरून वरून रविवारची भोम ग्रामपंचायतची ग्रामसभा वादळी होणार असल्यास संबंधित जे आराखडे बांधण्यात येत होते ते शेवटी सत्यात उतरले व ग्रामसभा चांगलीच वादळी झाली. काही वेळा प्रकरण हातघाईवर सुद्धा गेले. सरपंच दामोदर नाईक यांनी समय सूचकता दाखवताना वेळीच दोन्ही गटांमध्ये हस्तक्षेप केल्याने प्रकरण चिघळले नाही. 

रविवारी सकाळी सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू होताच वेगवेगळ्या विषयावरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाल धारेवर धरायला सुरुवात केली होती. प्रश्न वाढत चालले आहेत परंतु जो मूळ मुद्दा आहे तो चर्चेला येत नाही ते पाहून शेवटी इतर प्रश्न बाजूला ठेवण्यात आले व महामार्गाचा प्रश्न चर्चेला घेण्यात आला. त्यावेळी आंदोलन कर्ते संजय नाईक यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सरकारने ग्रामस्थांना कसे अंधारात ठेवले हे पटवून देण्याचा प्रयत्न ते करत होते.

त्याचवेळी सरपंच दामोदर नाईक हे मात्र त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करत होते. संपूर्ण पंचायत मंडळाला अंधारात ठेवून सर्वकाही गोष्टी घडत आहे याचे सुतोवाच ते करत होते. दोघांमध्ये वादविवाद चालू असतानाच ग्रामस्थांच्य दोन गटांमध्ये बाचांबाची सुरू झाली व प्रकरण हातघाई वर गेले. राष्ट्रीय महामार्ग गावातून नको असा हट्ट धरलेल्या महिला शेवटी उग्र बनल्या व त्या जे काही पंच  सदस्य प्रकल्पाला पाठिंबा देत आहे त्यांच्या अंगावर धावून गेल्या. त्याच वेळी काही लोक संजय नाईक यांच्या अंगावर धावून गेल्याने प्रकरण चिघळले गेले. शेवटी पोलिसांना अधिक कुमक मागवावी लागली.  सरपंच दामोदर नाईक यांनी प्रकरण हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच सभास्थान सोडून ग्रामस्थांमध्ये धाव घेतली व दोन्ही गटांची समजूत काढली. शेवटी लोकांचा एकूण रोष पाहून महामार्ग संबंधी सर्व पंचायत मंडळ ग्रामस्थ बरोबर राहील असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, स्थानिक आमदार इत्यादी व ग्रामस्थ इत्यादींची एक व्यापक बैठक लवकरच घेण्याचे ठरले .ह्या  ठरावावर  ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व सभा आटोपती घेण्यात आली.