शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

अंदाज बांधल्याप्रमाणे भोम ग्रामसभेत वादळ घोंघावलेच 

By आप्पा बुवा | Updated: November 26, 2023 17:21 IST

रविवारी सकाळी सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू होताच वेगवेगळ्या विषयावरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाल धारेवर धरायला सुरुवात केली होती.

फोंडा - राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्पावरून वरून रविवारची भोम ग्रामपंचायतची ग्रामसभा वादळी होणार असल्यास संबंधित जे आराखडे बांधण्यात येत होते ते शेवटी सत्यात उतरले व ग्रामसभा चांगलीच वादळी झाली. काही वेळा प्रकरण हातघाईवर सुद्धा गेले. सरपंच दामोदर नाईक यांनी समय सूचकता दाखवताना वेळीच दोन्ही गटांमध्ये हस्तक्षेप केल्याने प्रकरण चिघळले नाही. 

रविवारी सकाळी सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू होताच वेगवेगळ्या विषयावरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाल धारेवर धरायला सुरुवात केली होती. प्रश्न वाढत चालले आहेत परंतु जो मूळ मुद्दा आहे तो चर्चेला येत नाही ते पाहून शेवटी इतर प्रश्न बाजूला ठेवण्यात आले व महामार्गाचा प्रश्न चर्चेला घेण्यात आला. त्यावेळी आंदोलन कर्ते संजय नाईक यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सरकारने ग्रामस्थांना कसे अंधारात ठेवले हे पटवून देण्याचा प्रयत्न ते करत होते.

त्याचवेळी सरपंच दामोदर नाईक हे मात्र त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करत होते. संपूर्ण पंचायत मंडळाला अंधारात ठेवून सर्वकाही गोष्टी घडत आहे याचे सुतोवाच ते करत होते. दोघांमध्ये वादविवाद चालू असतानाच ग्रामस्थांच्य दोन गटांमध्ये बाचांबाची सुरू झाली व प्रकरण हातघाई वर गेले. राष्ट्रीय महामार्ग गावातून नको असा हट्ट धरलेल्या महिला शेवटी उग्र बनल्या व त्या जे काही पंच  सदस्य प्रकल्पाला पाठिंबा देत आहे त्यांच्या अंगावर धावून गेल्या. त्याच वेळी काही लोक संजय नाईक यांच्या अंगावर धावून गेल्याने प्रकरण चिघळले गेले. शेवटी पोलिसांना अधिक कुमक मागवावी लागली.  सरपंच दामोदर नाईक यांनी प्रकरण हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच सभास्थान सोडून ग्रामस्थांमध्ये धाव घेतली व दोन्ही गटांची समजूत काढली. शेवटी लोकांचा एकूण रोष पाहून महामार्ग संबंधी सर्व पंचायत मंडळ ग्रामस्थ बरोबर राहील असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, स्थानिक आमदार इत्यादी व ग्रामस्थ इत्यादींची एक व्यापक बैठक लवकरच घेण्याचे ठरले .ह्या  ठरावावर  ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व सभा आटोपती घेण्यात आली.