शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

सुदिन यांनी फॉर्म्युला पाळला नाही : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 19:26 IST

सरकार घडविताना काही अटी व फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता.

पणजी : सरकार घडविताना काही अटी व फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. मगोपचे नेते असलेले मंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्याचे पालन केले नाही. यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा लागला, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले.सचिवालयात पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले की, शिरोड्यात मगोपने विधानसभेची पोटनिवडणूक लढवू नये असे ठरले होते. भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांच्यासोबत मगो नेत्यांची चर्चा झाली होती. मी स्वत:ही सुदिन ढवळीकर यांच्याशी बोललो होतो. मात्र ते ऐकले नाहीत. शेवटी राज्याचे हित महत्त्वाचे असते, भावाचे हित नव्हे.सावंत म्हणाले, की आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर घडत असते. मगोपने हा कार्यक्रम पाळला नाही. फॉर्म्युला मानला नाही. शिरोडा मतदारसंघात मगोपने उमेदवार उभे करणे ही पूर्णपणे त्या पक्षाची चूक आहे. आम्ही मगो पक्ष फोडला नाही. मगोपच्या दोघा आमदारांना मगोमध्ये असुरक्षित वाटू लागले. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्यांना प्रवेश दिला. कुणीही भाजपमध्ये येत असल्यास आम्ही स्वागत करू.काँग्रेसचे कुणी आमदार भाजपामध्ये येऊ पाहत आहेत काय, असे पत्रकारांनी विचारले असता, आम्ही तसे काही ऐकलेले नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मगोपने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याविषयी काय वाटते, असे विचारताच सावंत म्हणाले, की मगोपच्या निर्णयाचा भाजपवर काही परिणाम होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहता, लोकसभेच्या गोव्यातील दोन जागा आणि पोटनिवडणुकीवेळी विधानसभेच्या तिन्ही जागा भाजपा जिंकेल.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा