शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सशक्त स्त्रिया सुदृढ परिवाराचा पाया; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस वाळपईत उत्साहात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : वयाच्या ७५ च्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अखंडपणे दीडशे कोटी जनतेची सेवा करण्यास तत्पर आहेत. महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी 'नारी सन्माना'च्या विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. घरातील सशक्त स्त्रिया सुदृढ परिवाराचा पाया आहे. घरातील स्त्री आजारी पडली तर ते कुटुंबच आजारी पडते. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या सुदृढ नारी सशक्त परिवार, महिला कल्याणच्या, महिला सन्मानाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

वाळपई कदंबा बसस्थानक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सबलीकरण व सेवा पंधरवडा या कार्यक्रमामध्ये मंत्री राणे बोलत होते. यावेळी पंतप्रधानांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मध्यप्रदेश येथून दृकश्राव्य पद्धतीने थेट प्रक्षेपित करण्यात आला होता.

तद्नंतर दुर्गा मूर्तींचे पूजन व सामुदायिक आरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी उत्तम आयुष्य व आरोग्य लाभो, अशी प्रार्थना आरोग्यमंत्री राणे यांनी केली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे, केंद्रीय आरोग्य खात्यातील अधिकारी, गोवा आरोग्य खात्याचे विविध अधिकारी, सरपंच पंचसदस्य व हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले की, घरातील स्त्री ही कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज असली पाहिजे. यासाठी त्यांचे आरोग्य जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विविध योजना जाहीर केलेल्या आहेत. त्याचा लाभ महिलांनी घ्यावा. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

...तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल

'स्वस्थ्य नारी, सशक्त परिवार' हा मूलमंत्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील गोरगरीब महिला शक्तीचा सन्मान करून त्यांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून आरोग्य शिबिरांचे विविध राज्यांत आयोजन करण्यात आलेले आहे. आपल्या घरातील स्त्री ही नुसती चूल व मूल बघत नाही, तर ती स्वतःच्या नवऱ्याचा आधार असते. येणारी पुढील पिढी घडविण्याचे कार्य ती अखंड करीत असते. प्रत्येक घरातील स्त्री सशक्त झाली तर आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी नमूद केले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण