शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

56 गावांना शहरांचा दर्जा देण्याच्या निर्णयाला गोव्यात तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 19:22 IST

निर्णय घेताना सरकारने या गावातील लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते अशी प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात येत आहे.

 

- सुशांत कुंकळय़ेकर मडगाव  - गोव्यातील 56 गावांना शहरी दर्जा देण्याच्या सरकारी आदेशाला संपूर्ण गोव्यातून विरोध होऊ लागला असून,  रविवारी झालेल्या वेगवेगळ्या ग्रामसभात त्याचे पडसाद उमटले. विशेषत: सासष्टी व बार्देश या दोन तालुक्यांतून हा विरोध जास्त होत असून, सासष्टीतील चार तर बार्देसातील दोन पंचायतीसह मुरगाव तालुक्यातील एका पंचायतीनेही ग्रामसभेतून या ठरावाला विरोध केला.पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या कांदोळी व साळगाव या बार्देसातील दोन पंचायतींबरोबरच सासष्टीतील सां जुङो द आरियल, आके बायश, कोलवा व केळशी तर मुरगावातील चिखली पंचायतीच्या ग्रामसभेने या आदेशाचा विरोध करण्याचा ठराव संमत केला. सरकारच्या या निर्णयामुळे गावात बांधकामे वाढून काँक्रीटची जंगले तयार होतील आणि साधनसामग्रीवरही त्यामुळे ताण येईल असा आक्षेप यावेळी घेण्यात आला. हा निर्णय घेताना सरकारने या गावातील लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते अशी प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आली. या वाढत्या  विरोधामुळे सरकार आपला निर्णय पुढे नेईल की लोक भावनेसमोर नमते घेईल हा प्रश्न  सध्या ऐरणीवर आला आहे.सासष्टीतील काही ग्रामीण भागांना शहरी दर्जा देण्याच्या सरकारी आदेशाचा आके बायश, कोलवा व केळशी या तीन पंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत  विरोध केला तर नावेली ग्रामसभेने अशा प्रकारचा दर्जा देण्याचा सरकारने विचारही करु नये, असा ठराव संमत केला. रविवारी झालेल्या खास ग्रामसभांत या निर्णयावर चर्चा करण्यात आली.  या दर्जामुळे गावातील स्वरूपच बदलून जाईल आणि  गावातील साधन सामग्रीवर ताण येईल  अशी भिती व्यक्त करण्यात आली.आके बायशचे पंच व माजी सरपंच सिध्देश भगत यांनी सरकारच्या या धोरणाला विरोध करताना  याचा गावक:यांना काही फायदा होणार नाही उलु बिल्डर लॉबीला फायदा होईल. आधीच गावातील साधन सामग्रीवर ताण असून  जर गावातील लोकवस्ती वाढली तर सगळी यंत्रणाच खिळखिळी होऊन जाईल असे ते म्हणाले.कोलवा व केळशी येथील ग्रामसभेनेही  त्यांच्या गावाना दिलेल्या शहरी दर्जाला  विरोध करत सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली. नावेली ग्रामसभेतही या विषयावर चर्चा झाली.  जरी नावेलीच्या कुठल्याही भागाला शहरी दर्जा दिलेला नाही तरी भविष्यातही तो देण्याचा विचार कुणी करु नये अशी मागणी ग्रामसभेने केली.  शहरीकरण रोखण्यासाठी योग्य ते उपाय घेण्याबरोबरच पुन्हा एकदा शेतीला चालना देण्याचा ठराव या ग्रामसभने मंजूर केला.यापूर्वी गोवा सरकारने तिसवाडी तालुक्यातील काही गावाना पीडीए क्षेत्रखाली आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही गावच्या लोकांनी या निर्णयाला तीव्रपणो विरोध केला होता. त्यामुळे सरकारही अडचणीत आले होते. शेवटी सरकारला हा आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. आता पुन्हा एकदा गावाच्या शहरीकरणाच्या निर्णयामुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या विरोधाला कसे सामोरे जातील हे येणा:या काळात स्पष्ट होणार.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार