शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

मंत्र्याला कडक डोस; प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 09:02 IST

मात्र काब्राल यांना बांधकाम खात्यातील नोकर भरतीच्या मुद्द्यावरून डच्चू दिला गेला.

 कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना योग्य तो डोस सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिला आहे. जाहीरपणे एखाद्या मंत्र्याला त्याच्या राजकीय क्षमतेची किंवा त्याच्या उणिवांची जाणीव करून देण्याचे धाडस कधी कोणताच प्रदेशाध्यक्ष दाखवत नाही. मात्र तानावडे यांनी ते धाडस केले आहे. मुळात नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन आलेक्स सिक्वेरा यांची तिथे नियुक्ती करण्याचे कारणच नव्हते. काब्राल मोठ्या आवाजात बोलणारे थोडे वेगळे नेते असले तरी, मंत्री म्हणून त्यांची कामगिरी कमी मोलाची नव्हती. ते सक्रिय होते. रात्रीच्या वेळीही कुणी फोन केला तर ते फोन कॉल घ्यायचे. शिवाय मिस्ड कॉल पाहून एखाद्या अपरिचितालादेखील फोन करायचे. समस्या सोडविण्याकडे काब्राल यांचा कल होता, हे अनेक आमदार आजदेखील सांगतात. मुळात काब्राल कुडचडे मतदारसंघातून निवडून आले ते सक्रियतेमुळेच. अर्थात, त्यांची कार्यपद्धत काहीजणांना दुखवणारी ठरली हा भाग वेगळा. तशी (स्व.) मनोहर पर्रीकर यांची कार्यशैलीदेखील काहीजणांना खूप दुखवत होती. मात्र काब्राल यांना बांधकाम खात्यातील नोकर भरतीच्या मुद्द्यावरून डच्चू दिला गेला.

काब्रालना बाजूला काढून सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात घेतले गेले तरी, लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला काही लाभ झाला नाही. सासष्टी तालुक्यात अल्पसंख्याकांनी भाजपला जास्त मते दिलीच नाहीत. सिक्वेरा यांना मंत्री केले तर, ख्रिस्ती धर्मगुरूदेखील आपल्या बाजूने राहतील, असे आभासी चित्र सिक्वेरा समर्थकांनी तयार केले होते. सिक्वेरा स्वतःच्या नुवे मतदारसंघातही भाजपला जास्त मते देऊ शकले नाहीत. या उलट सिक्वेरा सांगतात म्हणून सरकारने घाईघाईत नुवेतील काही जणांना लोकसभा निवडणुकीपूर्वी नोकऱ्या दिल्या होत्या. काहीजणांना तातडीने सेवेत कायम केले होते. सिक्वेरा यांच्या वाढदिनी प्रचंड गर्दी झाली होती. जणू काही पूर्ण नुवे मतदारसंघ आता भाजपमय झाला, असे तेव्हा काही भाजप नेत्यांनाही वाटले होते. मात्र नुवेत भाजपची सदस्य नोंदणीदेखील नीट होऊ शकली नाही. नुवेत भाजपला समाधानकारक प्रमाणातदेखील सदस्य मिळालेले नाहीत. मग आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात का ठेवायचे, असा प्रश्न कदाचित भाजपला पडला असावा. परवा तानावडे यांनी जे भाष्य केले, त्यातून बरेच काही कळून येते. सिक्वेरा हे अवघड जागी झालेले दुखणे असे भाजपला व कदाचित तानावडे यांनाही आता वाटत असावे.

आलेक्स सिक्वेरा यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला तानावडे यांनी उघडपणे सोमवारी दिला. जर सिक्वेरा यांना पुढील विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवायची असेल तर त्यांना आत्मपरीक्षण करावेच लागेल असे तानावडे म्हणाले. सिक्वेरा मंत्रिपदी असूनदेखील नुवेत भाजपला जास्त सदस्य मिळू शकले नाहीत, अशी खंत प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली. अर्थात, तानावडे यांना खंत जाहीरपणे व्यक्त करण्याचा निश्चितच अधिकार आहे. कारण सिक्वेरा यांना मोठ्या अपेक्षेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने व मुख्यमंत्र्यांनी मिळून मंत्रिपद दिले होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या इतर आमदारांनी किंवा मंत्र्यांनी मोठ्या संख्येने भाजप सदस्य नोंदवून दाखवले आहेत. विश्वजित राणे व दिव्या राणे यांनी मिळून ५० हजार सदस्य नोंद केले. पणजी मतदारसंघातही खूप ख्रिस्तीधर्मीय मतदार आहेत पण तिथेही मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सोळा हजार सदस्य नोंद करून दाखवले. ताळगावमध्ये जेनिफर मोन्सेरात यांनी दहा हजारांहून अधिक सदस्य नोंदणी केली. मुरगावमध्ये संकल्प आमोणकर यांनीही कष्ट घेऊन बऱ्यापैकी सदस्य नोंदणी केली. वाळपई व मुरगावमध्ये मुस्लीम धर्मीयदेखील भाजपचे सदस्य झाले आहेत. जिथे आमदार किंवा मंत्र्यांनी आळस केला, पक्षकार्यात रस दाखवला नाही, तिथेच भाजपचे सदस्य वाढू शकलेले नाहीत. वास्तविक सिक्वेरा २०२७ ची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढतील असे म्हणण्यास वाव नाहीच. भाजपचे तिकीट आपल्याला उपयुक्त ठरणार नाही असे त्यांना वाटले असावे. यापूर्वी सासष्टीत बाबाशान (विल्फ्रेड डिसा, नुवे) किंवा फिलीप नेरी रॉड्रिग्ज (वेळ्ळी) यांनीही भाजपचे तिकीट स्वीकारले नव्हते. असो. एखाद्या मंत्र्याला जाहीरपणे योग्य सल्ला देणारे तानावडे हे अलीकडच्या काळातील पहिले भाजप प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा