शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मोपा विमानतळाचे काम बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:55 IST

सुप्रिम कोर्टाचा आदेश : पर्यावरणीय परिणाम अभ्यास नव्याने होणार 

पणजी : गोव्यातील मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची सर्व कामे पुढील निर्देशांपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा विषय फेरआढाव्यासाठी पुन: पर्यावरण अभ्यास समितीकडे (ईएसी) पाठवण्यात आला असून यामुळे आता नव्याने पर्यावरणीय परिणाम अभ्यास करावा लागणार आहे. बांधकाम स्थगितीच्या आदेशात कुठल्याही न्यायालयाने हस्तक्षेप करु नये, असेही बजावले आहे. शेजारी सिंधुदुर्गतील चिपी विमानतळाबरोबरच घोषित झालेल्या ‘मोपा’चे काम अशा या ना त्या कारणांवरुन रखडतच चालले आहे. 

हनुमान आरोस्कर व फेडरेशन आॅफ रेनबो वॉरियर्स यांनी दोन वेगवेगळ्या याचिका केंद्र सरकारविरुध्द सादर करुन पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जागेत हा प्रकल्प येत असल्याने काम त्वरित बंद पाडावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.

 न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या व्दीसदस्यीय पीठासमोर या याचिका एकत्रित सुनावणीस होत्या. त्या निकालात काढताना न्यायमूर्तींनी केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाने २८ आॅक्टोबर २0१५ रोजी दिलेला पर्यावरणीय परवाना मोडीत काढला आहे. पर्यावरण अभ्यास समितीने आदेशाची प्रत हातात मिळाल्यापासून महिनाभराच्या आत अहवाल द्यावा, असेही आदेशात म्हटले आहे. 

‘मोपा’च्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची बेकायदा कत्तल चालू असल्याचा आरोप याचिकादारांनी केला होता. सुमारे ५५ हजार झाडे कापावी लागणार असा दावा याचिकेत करण्यात आला होता. राष्ट्रीय हरित लवादाने ‘मोपा’चा मार्ग खुला केल्यानंतर लवादाच्या आदेशाला या न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. जीएमआर कंपनीने केवियट अर्ज सादर केला होता. केंद्र व राज्य सरकारबरोबरच विमानतळाचे बांधकाम करणाºया जीएमआर इंटरनॅशनल कंपनीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा वरील आदेश मोठा दणका ठरला आहे. हा राष्ट्रीय प्रकल्प आहे आणि काम गतीने चालू असल्याची भूमिका जीएमआर कंपनीने घेतली होती. 

पर्यावरणीय परिणाम अभ्यास सदोष आहे कारण प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात झाडे असताना ही माहिती लपविण्यात आली, असे याचिकादारांचे म्हणणे होते. मोपाच्या नियोजित विमानतळासाठी वापरण्यात येत असलेल्या जमिनीचा काही भाग संवर्धित पश्चिम घाटात येतो तसेच पर्यावरणीय परिणाम अभ्यासात या प्रकल्पाच्या बाबतीत महाराष्ट्रात येणाºया काही भागाचा अभ्यास झालेलाच नाही असाही दावा करण्यात आला होता. 

गेल्या आॅगस्टमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने याचिकादारांनी पर्यावरणीय परिणाम अभ्यासाला दिलेले आव्हान फेटाळले होते. राज्यात जलस्रोत धोक्यात आहेत, पाण्याची तीव्र टंचाई आहे, जमिनींचा तुटवडा आहे या गोष्टी विचारात घेतल्या नाहीत. सार्वजनिक सुनावणी घेतली त्याचा अहवाल जाहीर केलेला नाही. या सुनावणीत पोलिस बळ वापरुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, आदी आरोप याचिकेत करण्यात आले होते. 

पर्यावरणीय अभ्यासाचा फेरआढावा घेताना हवा, पाणी, आवाज, जमीन, जैविक व सामाजिक - आर्थिक गोष्टींबाबत योग्य त्या अटी घालण्याची मुभा पर्यावरण अभ्यास समितीला देण्यात आली आहे. समिती जो अहवाल कोर्टाला सादर करील त्या अहवालास अन्य कुठल्याही न्यायालयात किंवा लवादासमोर आव्हान देता येणार नाही. मोपा संबंधीचे कोणतेही प्रकरण देशातील कुठल्याही न्यायालयाने कामकाजात घेऊ नये ,असेही आदेशात म्हटले आहे.