शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

पुतळाप्रश्नी काँग्रेसचा विधानसभेत ठराव, सरकारची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 21:10 IST

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 19 रोजी सुरू होत आहे. काँग्रेसच्या सर्व सोळाही आमदारांनी मिळून येत्या अधिवेशनात स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाविषयी ठराव मांडण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला

पणजी : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 19 रोजी सुरू होत आहे. काँग्रेसच्या सर्व सोळाही आमदारांनी मिळून येत्या अधिवेशनात स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाविषयी ठराव मांडण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा प्रकल्पासमोर व्हायला हवा अशी काँग्रेसची भूमिका असून तशी मागणी करणारा ठराव अधिवेशनात मांडला जाईल असे काँग्रेसने जाहीर केले. सरकारमध्ये या विषयावर दोन गट असल्याने अधिवेशनात पुतळाप्रश्नी सरकारची कसोटी लागेल हे स्पष्ट झाले.

शुक्रवारी पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नीळकंठ हळर्णकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. काँग्रेसच्या सोळाही आमदारांनी मिळून खासगी ठराव अधिवेशनात मांडवा व सरकारला पुतळा उभा करण्यास भाग पाडावे, असे काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत ठरल्याचे कवळेकर यांनी सांगितले. जनमत कौलामध्ये सिक्वेरा यांचे मोठे योगदान आहे, असे ते म्हणाले.

गोवा फॉरवर्ड पक्षाने यापूर्वी विधानसभेसमोर सिक्वेरा यांचा पुतळा व्हायलाच हवा अशी भूमिका घेतली आहे. भाजपने मात्र कुणाचाच पुतळा नको, भाऊसाहेब बांदोडकर यांचा आहे तेवढा पुरे, अशी भूमिका घेतली आहे. कुणीही विधानसभेत पुतळ्य़ासाठी ठराव मांडल्यास आपण पाठींबा देईन, असे गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. यामुळे या विषयावरून विधानसभेत सरकारमधील फुट पहायला मिळेल काय असा प्रश्न राजकीय क्षेत्रत आता चर्चेत येणार आहे.

टॅक्सी व्यवसायिकांच्या स्पीड गवर्नरचा विषयही काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चेस आला. गोव्यात नोंदणी झालेल्या टॅक्सींना स्पीड गवर्नरपासून मोकळीक द्यायला हवी. सध्या रस्त्यांवरून धावणा:या टॅक्सींना स्पीड गवर्नर नको, त्यासाठी केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी, असाही ठराव काँग्रेस पक्षाने घेतला असल्याचे शांताराम नाईक यांनी स्पष्ट केले. फेरीबोटीवर असलेल्या खलाशांना सीडीएसचे नूतनीकरण करण्यासाठी दहावी शिक्षित असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे हे खलाशी बोटीवर आहेत पण अशा प्रकारच्या प्रमाणपत्रची सक्ती कधीच करण्यात आली नव्हती. आता आम्ही दहावी शिकणार तरी कधी असा प्रश्न खलाशांनी विचारला आहे. आमची त्यांना सहानुभूती आहे व त्यामुळे काँग्रेस पक्ष पत्र लिहून दहावी शिक्षणाची अट मागे घ्यावी अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करील, असे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.