शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

राज्य कर्जाच्या खाईत

By admin | Updated: March 24, 2017 02:39 IST

पणजी : गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या काळात राज्यावरील कर्जाचा भार तब्बल ५ हजार १४६ कोटी रुपयांनी वाढला आहे. २0१२

पणजी : गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या काळात राज्यावरील कर्जाचा भार तब्बल ५ हजार १४६ कोटी रुपयांनी वाढला आहे. २0१२ पासूनची ही कर्जवाढ ७४.८८ टक्के इतकी आहे. वेगवेगळ्या सवलती तसेच योजनांच्या माध्यमातून वाटली जाणारी आर्थिक खिरापत आणि विशेष म्हणजे विकासकामांवर आवश्यकतेपेक्षा जास्त होणारा वायफळ खर्च राज्याला कर्जाच्या खाईत लोटण्यास कारणीभूत ठरला आहे.विधानसभेत सादर केलेल्या २0१६-१७च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षअखेर म्हणजेच ३१ मार्च २0१६ रोजी राज्याचे कर्ज १0,९४५ कोटी ३८ लाख रुपये इतके होते. येत्या ३१ मार्चपर्यंत कर्ज १२,०१८ कोटी ९५ लाख रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. वर्षभरातील कर्जवाढ १0३ कोटी ७८ लाख रुपये इतकी आहे.२0१२ साली राज्याच्या डोक्यावर ६,८७२ कोटी ३६ लाख रुपये कर्ज होते. गेल्या पाच वर्षांच्या काळात आर्थिक तूटही वाढली आहे. २0१२-१३ मध्ये ती १,१३७ कोटी ३६ लाख रुपये होती. आज आर्थिक तूट २,००१ कोटी ८३ लाख रुपयांवर पोहोचली आहे.स्टॅट्युटरी लिक्विडिटी आधारित खुल्या बाजारपेठेतील कर्जही वाढले आहे. एसएलआर आधारित बाजारपेठेतील कर्ज २0१३ साली ४६.५४ टक्के होते, ते या आर्थिक वर्षात ५९.४२ टक्क्यांवर पोहोचले आहे.जलक्रीडा धोरणाचा मसुदा कायदा खात्याकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे. कॅसिनोंसाठी विशेष बोटी, ट्रान्सशिपरर्सच्या नोंदणीसाठी नियम तयार केले जातील. मांडवी, जुवारी, म्हापसा आदी ठिकाणी सागरमाला योजनेंतर्गत ११ जेटी बांधल्या जातील, असे अहवालात म्हटले आहे.दोनापावल-वास्को जलदगती बोटसेवा अंतिम टप्प्यात आहे. कुंडई येथे जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीसाठी १0 हजार चौरस मीटर जमीन शोधण्यात आली आहे. प्रकल्प अभ्यासार्थ तज्ज्ञांचे पथक नेमण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. (प्रतिनिधी)