शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

या राज्यात अजूनही 85 टक्के गावांतील लोक बसतात उघड्यावर शौचास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 15:44 IST

आरोग्य आणि शिक्षण सुविधा या दोन माध्यमांमध्ये गोव्याने प्रगती केली आहे, असे जरी सांगण्यात येत असले तरी गोव्यातील गावांची स्थिती वेगळीच असल्याचे अंत्योदय योजनेच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

- सुशांत कुंकळयेकरमडगाव: आरोग्य आणि शिक्षण सुविधा या दोन माध्यमांमध्ये गोव्याने प्रगती केली आहे, असे जरी सांगण्यात येत असले तरी गोव्यातील गावांची स्थिती वेगळीच असल्याचे अंत्योदय योजनेच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. गोव्यातील 85 टक्के गाव अजूनही उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त झालेले नाहीत. तर 84 टक्के गावात शुश्रृषालयाची सोय नसल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर केवळ 12 टक्के गावातच व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत.अंत्योदय योजनेखाली ग्रामीण विकास मंत्रालयाने देशभरातील 1,10,765 गावांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात गोव्यातील 384 गावांचा समावेश होता. वीज, पाणी, दूरसंचार यंत्रणा, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक याबाबतीत गोव्यातील गावांची स्थिती उत्तम असली तरी शेतकी सुविधांच्या बाबतीत गोव्यातील गाव बरेच मागास असल्याचेही उघडकीस आले आहे. गोव्यातील केवळ 9 गावातच माती परीक्षण केंद्रे उपलब्ध असून, 15 गावांमध्ये बियाणांची केंद्रे तर 38 गावामध्ये खतांची दुकाने उपलब्ध असल्याचे या सर्वेक्षणातून माहिती पुढे आली आहे.या योजनेखाली गोव्यातील 186 ग्रामपंचायतींच्या खाली येणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या गावात असलेल्या सुविधेप्रमाणे त्यांना गुण देण्यात आले होते. गोव्यातील एकाही गावाला 80 पेक्षा जास्त गुण मिळालेले नसून 70 ते 80 या गुण मर्यादेत सहा, 60 ते 70 या गुण मर्यादित 52, तर 50 ते 60 या गुण मर्यादेत 79 गावांचा समावेश आहे. गोव्यात सर्वाधिक गुण कांदोळी (79) या पंचायतीला प्राप्त झाले असून, राष्ट्रीय क्रमवारीत या गावाला 22 वे स्थान मिळाले आहे. तर सर्वात कमी गुण सत्तरी भागातील केरी (29) या पंचायतीला प्राप्त झाले असून, राष्ट्रीय क्रमवारीत या गावाचा क्रमांक 72 वा आहे.गोव्यातील उत्कृष्ट पाच पंचायतींमध्ये कांदोळी नंतर फोंड्यातील कवळे, सासष्टीतील राय तसेच फोंड्यातील तिवरे-वरगाव व बांदोडा यांचा समावेश होत असून राष्ट्रीय क्रमवारीत या पंचायतींचे स्थान अनुक्रमे 23, 26, 27 व 30 असे आहे. तर निकृष्ट पाच पंचायतींमध्ये सत्तरीतील केरी व सावर्डे, सांगेतील काले, बार्देसातील नादोरा तर केपेतील कावरे या पंचायतींचा समावेश आहे. या पंचायतींचा राष्ट्रीय स्तरावरील क्रमांक अनुक्रमे 72, 70, 69, 67 व 66 असे आहेत. राष्ट्रीय पातळीवरील चित्र पहाता आंध्रप्रदेश, केरळ व तामिळनाडू या तीन राज्यांनी आघाडी घेतली असून तळांच्या राज्यांमध्ये छत्तीसगड व बिहार यांचा समावेश होत आहे. ग्रामपातळीवरील साधनसुविधा आणि मानवविकास व आर्थिक विकास या गुणनिकषावर हे सर्वेक्षण करण्यात आले होते.