शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

खाणबंदीच्या प्रश्नावर विधानसभेचे विशेष अधिवेशन विनाविलंब बोलवा - बाबू कवळेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 04:14 IST

खाणबंदीच्या प्रश्नावर चर्चेसाठी विधानसभेचे खास अधिवेशन विनाविलंब बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वेगवेगळी पत्रे लिहून केली आहे. 

पणजी : खाणबंदीच्या प्रश्नावर चर्चेसाठी विधानसभेचे खास अधिवेशन विनाविलंब बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वेगवेगळी पत्रे लिहून केली आहे. 

या पत्रात कवळेकर म्हणतात की, राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. हजारो लोकांसमोर खास करून डिचोली, सत्तरी, केपे, सांगे, धारबांदोडा, फोंडा तालुक्यातील लोकांच्या समोर संकट उभे ठाकले आहे. राज्य तसेच केंद्र सरकारचा महसूल बुडत आहे. त्यामुळे सामाजिक अस्वस्थता  निर्माण झाली आहे. या प्रश्नावर विधानसभेत  व्यापक चर्चा आवश्यक असून केंद्र सरकारला भावना कळवायला हव्यात त्यासाठी विधानसभेचे खास अधिवेशन बोलवावे, अशी मागणी कवळेकर यांनी केली आहे.

 सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील ८८ लीजांचे नूतनीकरण रद्दबातल ठरविलेनंतर गेल्या १५ मार्च पासून गोव्यात खाणी बंद आहेत. केंद्र सरकारने वटहुकूम काढावा किंवा एम एम डी आर कायद्यात दुरुस्ती करून खाणींना जीवदान द्यावे, अशी मागणी गेले काही महिने होत असताना केंद्र या दोन्ही गोष्टींसाठी अनुकूल नसल्याच्या बातम्या दिल्लीहून धडकल्याने खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक तसेच अन्य संबंधित व्यवसायिक यांच्यात अस्वस्थतेचे वातावरण आहे. खाणी कधी सुरू होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 खाण अवलंबितांनी सभापती प्रमोद सावंत यांच्या घरावर धडक देऊन त्यांची भेट घेतली तसेच भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनाही अवलंबितांचे शिष्टमंडळ भेटलेले आहे.  पंधरा ते वीस दिवसात याबाबत तोडगा काढू, असे आश्वासन तेंडुलकर यांनी अवलंबितांना दिलेले आहे. परंतु ही केवळ वरवरची आश्वासने आहेत अशी आता खाण अवलंबितांची भावना बनलेली आहे. विरोधी कॉंग्रेस पक्षाने आता हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून सरकारने चर्चेसाठी खास अधिवेशन बोलवावे अशी मागणी पक्ष पुढे रेटू लागला आहे.

टॅग्स :goaगोवा