शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपात्रता याचिकेसाठी सभापतींवर वेळेचे बंधन हवेच!; लोकायुक्तांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:51 IST

'लोकमत' कार्यालयास भेट.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आमदार अपात्रता याचिकेवर निकाल देण्यासाठी सभापतींवर वेळेचे बंधन असायला हवे, असे मत लोकायुक्त तथा हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी व्यक्त केले. 'लोकमत'ला बुधवारी दिलेल्या सौजन्य भेटीवेळी वार्तालापात ते बोलत होते. 

महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या तसेच अजित पवार गटाच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर ठरावीक कालावधीत निवाडा देण्याचे आदेश दिले आहेत. गोव्यातही सभापती रमेश तवडकर यांच्याकडे आठ काँग्रेसच्या फुटीर आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका आहेत. 

न्यायालयाने सभापतींना अपात्रता याचिकांवर निवाडा देण्यासाठी वेळेचे बंधन घालणे योग्य आहे का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, यावर माझे म्हणणे 'हो' असेच आहे. वेळेचे बंधन असायला हवे. लोकप्रभावाखाली न्यायदान करणे चुकीचे नव्हे. जनमताची कदर व्हायला हवी, न्यायालय न्याय देते असे म्हणण्यापेक्षा अन्याय निवारणाचे काम करते, असे म्हणणे उचित ठरेल, असेही ते म्हणाले. लोकायुक्त म्हणाले की, 'न्यायाधीशाने वकिलांना खरे तर प्रश्न करून खटल्यातील न उलडगणारे पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करावा.

सरकारी निर्णयांविरुद्ध अपिलांची संख्या वाढत आहे. त्याबद्दल विचारले असता लोकायुक्त म्हणाले की, वरिष्ठ सरकारी अधिकारी जेव्हा काही निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या विद्वत्तेला किंवा शहाणपणाला आव्हान देता येणार नाही. त्या-त्या परिस्थितीला अनुसरून काळानुरूप निर्णय घेतले जात असतात. सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आव्हान देऊन कसे चालेल?, असेही जोशी म्हणाले.

आय एम विथ यू...

जो न्यायाधीश बोलत नसतो तो घातक असतो. मी वकील असताना कोर्टात अशिलाची बाजू मांडत असताना न्यायाधीशाने मला 'आय एम विथ यू, असे सांगत युक्तिवाद थांबवण्यास सांगितले त्यानुसार मी युक्तिवाद थांबवला. परंतु नंतर विरुद्ध पक्षाच्या बाजूने निकाल दिला. न्यायाधीश जेव्हा काहीच बोलत नाही तेव्हा न्यायालयात आपण केलेला युक्तिवाद किंवा मुद्दे न्यायाधीशाला पटले आहेत किंवा नाहीत, हे वकिलाच्या लक्षात येत नाही.'

 

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमत