शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

दक्षिण भारतातील राज्यांनी हिंदी शिकावी: मुख्यमंत्री सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2024 13:11 IST

हिंदी भाषिकांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : दक्षिण भारतातील राज्यांनी हिंदी शिकली पाहिजे आणि ती राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली पाहिजे. केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही दक्षिण भारतातील काही प्रादेशिक राजकीय पक्ष अजूनही हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

राज्योतिक राष्ट्रभाषा विद्यापीठाने कार्य करणाऱ्या हिंदी भाषिक मान्यवरांच्या सन्मान समारोह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रवींद्र भवन येथे आयोजित या समारंभात मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला. त्यावेळी अनेकजण मराठी भाषेत शिकत होते आणि राज्यात हिंदी भाषा फारशी प्रबळ नव्हती. पण जसजसा वेळ निघून गेला तसतसे शेजारील राज्यातून बरेच लोक गोव्यात स्थायिक झाले आणि त्यानंतर राज्यात हिंदी आणि कन्नड भाषेचा प्रभाव वाढला.

राष्ट्रभाषेतून संवादात होते मदत 

मला वाटते की, या सर्व दक्षिण भारतीय राज्यांनी हिंदी भाषा शिकली पाहिजे, कारण ती काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत संपर्काची मुख्य भाषा आहे. प्रादेशिक भाषाही वापरायला हव्यात यात शंका नाही पण हिंदी भाषा शिकल्याने कामात आणि संवादात मदत होईल. हिंदी भाषेतून आपण एकमेकांशी जोडले जाणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आमदार दिगंबर कामत, कोकण रेल्वेचे अधिकारी संतोष कुमार झा आदींनीही हिंदी भाषेबाबत मत व्यक्त केले. गोव्यात हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सहा जणांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत