शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जगप्रसिद्ध दोनापावल जेटीचा काही भाग पर्यटकांसाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 13:28 IST

गोव्यातील दोनापावल ह्या जगप्रसिद्ध जेटीचा काही भाग असुरक्षित बनलेला असल्याने तो कोसळू शकतो हे लक्षात घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी जेटीचा हा भाग पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सदगुरू पाटील

पणजी : गोव्यातील दोनापावल ह्या जगप्रसिद्ध जेटीचा काही भाग असुरक्षित बनलेला असल्याने तो कोसळू शकतो हे लक्षात घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी जेटीचा हा भाग पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी लेवीनसन मार्टीन्स यांनी याबाबतचा आदेश जारी केला असून हा आदेश येत्या 5 नोव्हेंबरपासून लागू होत आहे. रोज देश व विदेशातील काही हजार पर्यटक दोनापावलच्या जेटीकडे जात असतात. सकाळपासून रात्रीपर्यंत पर्यटकांचे तिथे येणे-जाणे सुरू असते. स्थानिकही अनेकदा जाऊन येतात.

राजधानी पणजीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेली दोनापावलची जेटी ही वैशिष्टय़पूर्ण आहे. त्या जेटीचा काही भाग कमकुवत झालेला आहे. तो अत्यंत धोकादायक बनल्याने तो भाग बंद केला जात असल्याची कल्पना जिल्हाधिका-यांनी पोलीस खाते, वाहतूक पोलिस, वीज खाते व पणजी महापालिकेसह इमेजिन स्मार्ट पणजी ह्या यंत्रणेलाही दिली आहे. दोनापावल जेटीकडे अजय देवगणच्या सिंघम चित्रपटासह अनेक सिनेमांचे चित्रिकरण झालेले आहे. एके काळी कमल हसन मुख्य भूमिकेत असलेल्या एक दुजे के लिए चित्रपटाच्या चित्रिकरणाने ही जेटी जास्त प्रकाशझोतात आणली. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश आदी भागांतून येणारे देशी पर्यटक तर ह्या जेटीला भेट दिल्याशिवाय माघारी जात नाहीत. या जेटीकडून अरबी समुद्राचे मनोहारी दृश्य दिसते. सूर्यास्ताच्यावेळी येथे हजारो पर्यटक छायाचित्रे काढतात. समुद्राच्या कडेला जाऊन सेल्फी घेतात. काळेशार खडक आणि समुद्राच्या पांढ-याशुभ्र लाटा दोनापावलच्या उंच ठिकाणावरून पाहणे हे खूप आनंददायी असते. कधी खनिज तर कधी अन्य माल घेऊन मोठी जहाजे समुद्रातून जाताना दिसतात. होड्यांद्वारे मासेमारी पहायला मिळते. 

दोनापावच्या ज्या जेटीचा भाग बंद केला जात आहे, तिथे पोलिसांनी अधिक लक्ष ठेवावे तसेच तेथील वीज पुरवठा खंडीत करून टाकावा आणि पणजी महापालिकेने तो भाग बंद केल्याचे फलक एनआयओ सर्कलसह अन्य सर्व ठिकाणी लावावेत असे जिल्हाधिका-यांनी बजावले आहे. जेटीकडील विक्रेत्यांना व्यवस्थित दुसरी जागा दिली जावी, जेणेकरून वाहतुकीची समस्या येणार नाही, असेही जिल्हाधिका-यांनी म्हटले आहे. आवश्यक बॅरीकेड्स लावावेत व जर कुणी आदेशाचा भंग करून असुरक्षित भागात गेले तर त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 188 कलमाखाली कारवाई करावी,असे जिल्हाधिका-यांनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवा