शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

आधी वारकऱ्यांच्या समस्या सोडवा, मगच निवास बांधा; आमदार विजय सरदेसाई यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2024 08:28 IST

अधिवेशनाच्या शून्य तासाच्या कामकाज दरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय मांडला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सुमारे २१ मंडळे ४५० किलोमिटर पेक्षा जास्त अंतर पायी चालत पंढरपूर वारी करत असतात. वारी दरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या वारकऱ्यांना सरकारने समाजकल्याण खात्यातर्फे थोडेफार अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. केवळ पंढरपूर येथे पोहचून भक्त निवास बांधणार, हे जाहीर केले म्हणजे वारकऱ्यांच्या समस्या सोडवल्या असे होत नाही, अशी टोला देखील सरदेसाई यांनी लगावला.

अधिवेशनाच्या शून्य तासाच्या कामकाज दरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय मांडला. वारकऱ्यांना वारी दरम्यान कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याची कल्पना देखील दिली. वारकरी मोठ्या श्रध्देने पायी चालत पंढरपूरला जातात. त्यांना प्रवासात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खासकरून बेळगाव ते कोल्हापूर या दरम्यान त्यांना वाटेत नीट सुविधा मिळत नाही. येथे शौचालये नाही किंवा आंघोळ करण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी योग्य सुविधा नाहीत. त्यामुळे सरकारने यात लक्ष्य घालून वारकऱ्यांना तशा प्रकारच्या सुविधा दिल्या जाऊ शकतात का, हे पाहावे. या सुविधा मिळाल्या नाहीत तर वारकरी आजारी पडण्याच्या भीती असते, असे सरदेसाई यांनी सांगितले.

सरकारने वारकऱ्यांना सुरक्षित घरी आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी. हज यात्रेसाठी समाज कल्याण खात्यातर्फे अनुदान दिले जाते, त्याच धर्तीवर वारकऱ्यांना देखील अनुदान देण्याची गरज आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. यावर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक गोष्टी करू, असे सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन