शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

आधी वारकऱ्यांच्या समस्या सोडवा, मगच निवास बांधा; आमदार विजय सरदेसाई यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2024 08:28 IST

अधिवेशनाच्या शून्य तासाच्या कामकाज दरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय मांडला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सुमारे २१ मंडळे ४५० किलोमिटर पेक्षा जास्त अंतर पायी चालत पंढरपूर वारी करत असतात. वारी दरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या वारकऱ्यांना सरकारने समाजकल्याण खात्यातर्फे थोडेफार अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. केवळ पंढरपूर येथे पोहचून भक्त निवास बांधणार, हे जाहीर केले म्हणजे वारकऱ्यांच्या समस्या सोडवल्या असे होत नाही, अशी टोला देखील सरदेसाई यांनी लगावला.

अधिवेशनाच्या शून्य तासाच्या कामकाज दरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय मांडला. वारकऱ्यांना वारी दरम्यान कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याची कल्पना देखील दिली. वारकरी मोठ्या श्रध्देने पायी चालत पंढरपूरला जातात. त्यांना प्रवासात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खासकरून बेळगाव ते कोल्हापूर या दरम्यान त्यांना वाटेत नीट सुविधा मिळत नाही. येथे शौचालये नाही किंवा आंघोळ करण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी योग्य सुविधा नाहीत. त्यामुळे सरकारने यात लक्ष्य घालून वारकऱ्यांना तशा प्रकारच्या सुविधा दिल्या जाऊ शकतात का, हे पाहावे. या सुविधा मिळाल्या नाहीत तर वारकरी आजारी पडण्याच्या भीती असते, असे सरदेसाई यांनी सांगितले.

सरकारने वारकऱ्यांना सुरक्षित घरी आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी. हज यात्रेसाठी समाज कल्याण खात्यातर्फे अनुदान दिले जाते, त्याच धर्तीवर वारकऱ्यांना देखील अनुदान देण्याची गरज आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. यावर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक गोष्टी करू, असे सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन