शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

आधी वारकऱ्यांच्या समस्या सोडवा, मगच निवास बांधा; आमदार विजय सरदेसाई यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2024 08:28 IST

अधिवेशनाच्या शून्य तासाच्या कामकाज दरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय मांडला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सुमारे २१ मंडळे ४५० किलोमिटर पेक्षा जास्त अंतर पायी चालत पंढरपूर वारी करत असतात. वारी दरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या वारकऱ्यांना सरकारने समाजकल्याण खात्यातर्फे थोडेफार अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. केवळ पंढरपूर येथे पोहचून भक्त निवास बांधणार, हे जाहीर केले म्हणजे वारकऱ्यांच्या समस्या सोडवल्या असे होत नाही, अशी टोला देखील सरदेसाई यांनी लगावला.

अधिवेशनाच्या शून्य तासाच्या कामकाज दरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय मांडला. वारकऱ्यांना वारी दरम्यान कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याची कल्पना देखील दिली. वारकरी मोठ्या श्रध्देने पायी चालत पंढरपूरला जातात. त्यांना प्रवासात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खासकरून बेळगाव ते कोल्हापूर या दरम्यान त्यांना वाटेत नीट सुविधा मिळत नाही. येथे शौचालये नाही किंवा आंघोळ करण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी योग्य सुविधा नाहीत. त्यामुळे सरकारने यात लक्ष्य घालून वारकऱ्यांना तशा प्रकारच्या सुविधा दिल्या जाऊ शकतात का, हे पाहावे. या सुविधा मिळाल्या नाहीत तर वारकरी आजारी पडण्याच्या भीती असते, असे सरदेसाई यांनी सांगितले.

सरकारने वारकऱ्यांना सुरक्षित घरी आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी. हज यात्रेसाठी समाज कल्याण खात्यातर्फे अनुदान दिले जाते, त्याच धर्तीवर वारकऱ्यांना देखील अनुदान देण्याची गरज आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. यावर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक गोष्टी करू, असे सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन