शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

राजस्थाननंतर गोव्यात होणार माध्यमांची मुस्कटदाबी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 19:44 IST

प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारा अद्यादेश जो राजस्थानात भाजप सरकारने जारी केला आहे तो डाव यशस्वी झाल्यास गोव्यातही तेच प्रकार घडणार असल्याची भिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी व्यक्त केली आहे. 

पणजी - प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारा अद्यादेश जो राजस्थानात भाजप सरकारने जारी केला आहे तो डाव यशस्वी झाल्यास गोव्यातही तेच प्रकार घडणार असल्याची भिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी व्यक्त केली आहे. माद्यमांवर निर्बंध लादणारे कायदे भाजप सरकार देशभर बनवू पाहत आहे. राजस्थानमध्ये सध्या प्रयोग सुरू आहे. राजस्थान सरकारच्या या हरकतीमुळे लोक संतप्त झाले आहेत. परंतु लोकांच्या विरोधाला न जुमानता हुकूमशाही चालविण्याचा सरकारचा डाव दिसत आहे. राजस्थानमध्ये या लोकांचे साधले तर गोव्यातही ते प्रयत्न निश्चितच होतील असे नाईक म्हणाले. राजस्थान सरकारचा अद्यादेश सध्या कायद्याच्या कात्रीत अडकला असून घटनात्मक मुल्यांच्या विरोधात तो असल्याचे त्यांनी सांगितले. तियात्रवर जीएसटी लावण्याच्या सरकारच्या कृतीचा नाईक यांनी विरोध केला. तियात्र  हा गोव्याचा आवडता नाट्य प्रकार आहे. विशेष करून ख्रिस्ती लोकांत हा अत्यंत प्रिय नाट्य प्रकार आहे. तियात्रवर लागू करण्यात आलेला जीएसटी ताबडतोब मागे घेण्यात यावा, मग ते कंपन्यांचे तियात्र असो किंवा खाजगी, असे ते म्हणाले. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी तियात्रवरील जीएसटी मागे घेतला जाणार असल्याचे आश्वासन लोकांना दिले आहे. परंतु जीएसटी प्रकरणात राज्य सरकारला किती अधिकार आहेत त्यावरही बरेच काही अवलंबून आहे असे ते म्हणाले.  

‘सुदिरसूक्त वाचले नाही’माजी आमदार विष्णू वाघ यांच्यावर त्यांच्या सुदिरसूक्त या कवितासंग्रसासाठी गुन्हा नोंदविण्यात आल्याच्या प्रकरणात शांताराम नाईक यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा त्यांनी अद्याप आपण सुदिरसूक्त वाचले नसल्याचे सांगितले. गुन्हा नोंदवून चार दिवस झाल्यानंतरही या प्रकरणात कॉंग्रेस पक्ष प्रतिक्रिया का व्यक्त करीत नाही असे विचारले असता कॉंग्रेस कोणत्याही प्रकरणात प्रतिक्रिया देण्यापासून पळ काढत नसल्याचे ते म्हणाले. सुदिरसूक्त पुस्तक आपण वाचणार आहे आणि नंतर निश्चितच प्रितिक्रिया देणार आहे असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाMediaमाध्यमे