शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

'स्मार्टसिटी'ची कधीतरी चौकशी व्हावी; गोव्यातील उच्च न्यायालयाचे निरीक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2024 08:13 IST

योजनेसाठीच्या विविध एजन्सींमध्ये समन्वय नसल्याची टिप्पणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून केलेली स्मार्ट सिटीची कामे अशी रेंगाळतात आणि लोकांसाठी त्रासदायक ठरतात, याची केव्हातरी चौकशी झाली पाहिजे असे खरमरीत निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नोंदविले आहे.

स्मार्ट सिटी योजनेच्या नावाने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टीची चौकशी करण्याची मागणी आतापर्यंत सर्वच विरोधी पक्षांनी आणि बिगर राजकीय व्यक्तींनीही केली होती. आता न्यायालयानेही या मागणीला समर्पक असेच निरीक्षण नोंदविल्यामुळे सरकारची नामुष्की झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही कामे का रखडली ? आणि लोकांना त्रासदायक का ठरली? याची चौकशी कधीतरी व्हायला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती महेश सोनक आणि वाल्मिकी मिनेंझिस यांनी १ एप्रिल रोजी स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली होती. या पाहणीच्या निष्कर्षांबाबतीत न्यायाधीश समाधानी नव्हते. पाहणीवेळी लोकांकडून बऱ्याच तक्रारीही त्यांनी ऐकल्या होत्या. सध्या सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे होणाऱ्या प्रदूषणाशी संबंधित जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होण्याची चिन्हे दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. 

२७ मार्च रोजीच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी काही उपाययोजना केल्या आहेत. परंतु गेल्या दोन वर्षात परिसरात साचलेले धुळीचे थर धुण्यासाठी असे उपाय पुरेसे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुख्य म्हणजे स्मार्ट सीटी योजनेसाठी काम करणाऱ्या विविध एजन्सींत समन्वय हा अपघातानेच होत असावा, अशी टीपण्णीही न्यायालयाने केली आहे.

न्यायालयाने या प्रकल्पाच्या सल्लागारांवरही ताशेरे ओढले आहेत. ज्या सल्लागारांनी या प्रकल्पाची योजना आखली होती, त्यांनी अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याची गरज होती. परंतु हे सल्लागार कुठेही दिसले नाहीत, अशा शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

उच्च न्यायालयाने प्रकल्पासाठी काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली असून, केवळ स्थलांतरित असल्याने त्या कामगारांच्या आरोग्याकडे आणि कल्याणाकडे दुर्लक्ष करू नये, असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. कामावर असताना अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना भरपाई तातडीने मिळावी, अशी अपेक्षाही उच्च न्यायालयाने व्यक्त केली.

 

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी