शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

माफी मागण्याची पळवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2024 08:14 IST

नवे सॉरीवीर बाबूश मोन्सेरात यांनी राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांना विलंब झाल्याने आपण सॉरी म्हणतो, असे जाहीर केले. 

राजकीय नेते निवडणुकांवेळी सर्वच बाबतीत माफी मागत असतात. नोकऱ्या देता आल्या नाही तर माफी मागतो, पूल बांधता आला नाही तर सॉरी, एखाद्या गुन्ह्याला कारण ठरलो असेन तर माफी मागतो, असे राजकारणी प्रत्येक निवडणुकीवेळी सांगत असतात. आठ वर्षांपूर्वी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षदेखील गोव्यातील लोकांना सांगायचे, की पक्षांतरे करणाऱ्या व्यक्तींना आम्ही पूर्वी तिकिटे दिली त्यासाठी माफी मागतो; मात्र काँग्रेस पुन्हा तसे करणार नाही हेही ते स्पष्ट करायचे. आता ही आठवण काढण्याचे कारण म्हणजे नवे सॉरीवीर बाबूश मोन्सेरात, मोन्सेरात यांनी राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांना विलंब झाल्याने आपण सॉरी म्हणतो, असे रविवारी जाहीर केले. 

लोकसभा निवडणुकीनिमित्ताने मोन्सेरात शनिवार-रविवारपासून मैदानात उतरले आहेत. भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचार कामापासून आपण दूर राहिलो, तर उत्पल पर्रीकर संधी साधतील व पुढे येतील असा विचार करून मोन्सेरात यांनी प्रचार काम सुरू केले आहे. पणजीवासीयांना सामोरे जाताना मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटी योजनेची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा नव्याने व्यक्त केली. ही कामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याबद्दल सॉरी म्हणतो असेही बाबूशने जाहीर केले. 

अर्थात हा सगळा दिखावा आहे, हे पणजीच्या सुशिक्षित नागरिकांना कळतेच. राजकीय नेत्यांनी निवडणुकीवेळी माफी मागणे हे एक उत्कृष्ट नाटक असते. अवधेच मतदार व कार्यकर्ते अशा नाटकांना फसतात, हा मुद्दा वेगळा. विविध राज्यांमध्ये राजकारणी पूर्वीच्या चुकांविषयी सॉरी म्हणत वेळ मारून नेतात आणि एकदा निवडणूक प्रक्रिया पार पडली की मग मतदारांच्या त्रासांकडे ते ढुंकूनदेखील पाहत नाहीत. अर्थात मोन्सेरात त्याच वाटेवरून चाललेत असे आम्ही म्हणत नाही, पण पणजीतील लोकांची त्यांनी आता माफी मागणे यात प्रामाणिकपणा किती व नाट्य किती हे आजच्या काळात खूप तपशीलाने कुणाला सांगण्याची गरज नाही.

निवडून येताच आपण शंभर दिवसांत मांडवीतील कसिनो हटवीन, असे जाहीर आश्वासन मोन्सेरात यांनी काही वर्षांपूर्वी पणजीच्या लोकांना दिले होते. बाबूश निवडून आल्यानंतर मग भाजपमध्ये गेले. 'भाजप सरकारच्या डोळ्यांदेखत कसिनोंचे मोठे साम्राज्य पणजीत उभे झाले आणि त्याचा त्रास पणजीवासीयांना होतोय; मात्र त्याविषयी कुणीच सॉरी म्हणत नाही. स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीतील लोकांना अजूनही प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभारामुळे लोकांच्या वाट्याला जे हाल आले, त्याची दखल अगदी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेतली. न्यायाधीशांनी चक्क फिल्डवर, पणजीतील रस्त्यांवर येऊन पाहणी केली. कंत्राटदाराच्या आणि मजुरांच्याच भरवशावर कामे केली जात आहेत असे चित्र दीड वर्षापूर्वी लोकांनी अनुभवले. 

संजीत रॉड्रिग्जसारख्या अधिकाऱ्याची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी नियुक्ती करण्याची हुशारी गोवा सरकारला आधी दाखवता आली नाही. अति झाल्यावर लोकांनी आणि मीडियाने ओरड सुरू केल्यावर सरकारने संजीतची नियुक्ती केली. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये गुंतलेली सरकारी खाती व अन्य यंत्रणा यांच्यात समन्वय असायला हवा होता. मध्यंतरी तो अजिबातच नव्हता, माजी नगरसेवकाचा एक तरुण मुलगा खड्ड्यात पडून मरण पावला. रस्त्याबाजूच्या दुकानदारांचे, हॉटेलवाल्यांचे नुकसान झाले. तरी पे पार्किंगच्या नावाखाली काहीजण पणजीवासीयांना लुटत राहिले. वाहतुकीची रोज कोंडी होत असताना सरकारचे गृहखाते रोज दुपारी व सायंकाळी वाहतूक पोलिसदेखील नियुक्त करत नव्हते. 

गोवा सरकार पणजीबाबत एवढे प्रचंड असंवेदनशील झाले आहेत, निदान हा मतदारसंघ आपला पूर्वीचा सर्वोच्च नेता मनोहर पर्रीकर यांच्याकडे वीस वर्षांहून अधिक काळ होता, याचे तरी भान भाजप सरकारने ठेवायला हवे होते. पणजीची दैना होत असताना उद्योजक मनोज काकुले वगैरे आवाज उठवत राहिले. त्यावेळी आमदार मोन्सेरातदेखील पणजीच्या मदतीला आले नव्हते. आता सगळ्या यंत्रणा थोड्याफार सक्रिय आहेत. आता वाहतूक पोलिस काही प्रमाणात पणजीत दिसतात. खरे म्हणजे केवळ आमदाराने नव्हे तर पूर्ण गोवा मंत्रिमंडळाने पणजीतील प्रत्येक लोकांच्या घरी जाऊन व नाक घासून सॉरी म्हणायला हवे. 

 

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी