शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

'स्मार्ट' धूळ प्रदूषण रोखण्यासाठी लगबग; न्यायाधीशांकडून कामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2024 10:26 IST

या कामांसाठी वारंवार रस्ते खोदले जात असल्याने त्या परिसरातील व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांची (आज) सोमवार, दि. १ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पाहणी करणार आहेत. त्यामुळे या कामांमुळे होणारे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी स्मार्ट सिटीची लगबग सुरू झाली आहे. पणजीत मागील दीड वर्षापासून स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. या कामांमुळे होणारे धूळ प्रदूषण रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. या कामांसाठी वारंवार रस्ते खोदले जात असल्याने त्या परिसरातील व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.

या याचिकांच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश पाहणी करतील. धूळ प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी ज्याठिकाणी कामे सुरू आहेत, तेथे दिवसातून दोनवेळा पाण्याची फवारणी, रस्त्याची नियमितपणे साफसफाई करणे, आदी पावले स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराने उचलली आहेत. त्याशिवाय त्यांनी या सर्वांची जबाबदारी कंत्राटदार एजन्सी मेसर्स बागकिया, मेसर्स एमव्हीआर व मेसर्स बन्सल यांच्यावरही दिली आहे. त्यामुळे या कंत्राटदारांचीही धूळ प्रदूषण रोखण्यासाठी धावपळ सुरू आहे. ते यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. 

सुमारे एक हजार कोटी रुपये या स्मार्ट सिटीच्या कामांवर खर्च केला जात आहे. मात्र, या कामांच्या दर्जाबाबतही वारंवार प्रश्न उपस्थित केला जात आहे. पणजी मनपाचे माजी नगरसेवक उदय मडकईकर यांनी या कामांचे ऑडिट करावे, अशी मागणी केली आहे. तर यापूर्वी पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही या कामांच्या दर्जाबाबत शाश्वती दिली जाऊ शकत नाही, असे म्हटले होते.

याचिकेची दखल

स्मार्ट सिटीची कामे बेशिस्तपणे केली जात असल्याने एका युवकासह तिघांचा जीव गेल्याचेही या याचिकेत नमूद केले आहे. या कामांमुळे पणजीवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यावर तोडगा काढण्याची मागणी करत पणजीतील दोन नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. 

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी