शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शहर गेले खड्ड्यात, कुत्रे स्मार्ट करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 11:21 IST

राजधानी पणजी शहराने केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा पूर्ण पराभव केला आहे.

राजधानी पणजी शहराने केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा पूर्ण पराभव केला आहे. गोव्यात नॅशनल गेम्स होत आहेत. याचा मुख्यमंत्री सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांना प्रचंड अभिमान. अर्थात अभिमान असायलाच हवा. जिथे प्रचंड पैसा खर्च करण्याचे निमित्त मिळते, तिथे तर प्रत्येक कार्यकर्त्याला गर्व वाटायला हवा. छाती फुगायला हवी. अकरा हजार क्रीडापटूंना गोवा सरकार हाताळणार आहे. 'शो मस्ट गो ऑन', असे म्हणत कोट्यवधी रुपये खर्च केले जातील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, २६ रोजी गोव्यात येतील. ते फातोर्डा येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करतील. खरे म्हणजे सावंत मंत्रिमंडळाने पंतप्रधानांना राजधानीत फिरून आणायला हवे. खड्डेमय रस्ते, धुळीचे साम्राज्य, एकदा काम करून झाल्यानंतरही पुन्हा विविध यंत्रणांनी फोडून ठेवलेले रस्ते, रस्त्याच्या कडेलाच उघड्या गटारांमधील वायर्स, अत्यंत कसरत करत वाहन चालविणारे वाहन चालक, मध्येच खाली पडणाऱ्या दुचाकी वगैरे चित्र गोवा सरकारने जर आदरणीय पंतप्रधानांना दाखवले, तर स्मार्ट सिटी म्हणजे काय असू शकते, याची कल्पना पूर्ण देशाला येईल. सोबत स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना घ्यायलाच हवे. राज्याचे मुख्य सचिव गोयल हे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे प्रमुख आहेत. ते कधी पणजीत कामांच्या पाहणीसाठी फिरतच नाहीत. 

रायबंदर ते सांतईनेज पणजीपर्यंत जर पंतप्रधानांनी फेरफटका मारला, तर गोव्याचे राज्यकर्ते व आयएएस अधिकारी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कसे मातेरे करू शकतात, हे आदरणीय मोदींना कळून येईल. मोन्सेरात यांचे पुत्र रोहित है पणजीचे महापौर आहेत. सर्व नगरसेवकांनाही पणजीतील भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी सोबत घ्यावे. नगरसेवकही स्मार्ट सिटी कामांवर प्रचंड नाराज आहेत. सल्लागार बदलण्याची मागणी पूर्वी बाबूश मोन्सेरात यांनी केली होती. काही कामे निकृष्ट दर्जाची होतील, असे पावसाळ्यापूर्वी ते म्हणाले होते. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये अनेक सरकारी खाती व विविध यंत्रणा गुंतलेल्या आहेत; पण त्यांच्यात समन्वय नाही. कोणती यंत्रणा कोणते काम करतेय, हे एकमेकाला ठाऊक नाही. स्वर्गीय मनोहर पर्रीकर जर आज पणजीच्या आमदारपदी असते, तर त्यांनी समन्वयासाठी सातत्याने बैठका घेतल्या असत्या. आता वरिष्ठ स्तरावर बैठकाच होत नाहीत. 

आमदार मोन्सेरात यांना संबंधित यंत्रणा विश्वासातही घेत नसावी असे वाटते. पहिल्या 'इफ्फी' वेळी कमी वेळेत साधनसुविधा निर्माण करण्यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री पर्रीकर हे रात्री एक वाजेपर्यंत धावपळ करायचे. सातत्याने पर्रीकर फिल्डवर असायचे. त्यामुळे आयनॉक्स मल्टिप्लेक्स उभा राहिला, पाटो येथील समांतर पूल उभा राहिला. कला अकादमीचे नूतनीकरण झाले होते. आता स्मार्ट सिटी म्हणजे नको झालेले मूल अशी स्थिती वाट्याला आली आहे. रायबंदरमध्ये चला किंवा साइनेजची दुर्दशा पाहा. वारंवार खोदाईच सुरू आहे. रस्त्याच्या बाजूने चालताही येत नाही. फूटपाथ बुजून गेले.

पणजी व ताळगावमध्ये आता कुत्र्यांना स्मार्ट करण्याची मोहीम सुरू झाली आहे. पणजी व ताळगावमध्ये पाळीव कुत्र्यांना मायक्रोचीप बसविण्याचे काम सुरू झाले आहे. चीपमध्ये मालकाचे नाव, मोबाइल क्रमांक असेल. शिवाय लसीकरण, नसबंदी केली की नाही, याची माहिती चीपमध्ये असेल. चीप त्यासाठी स्कॅन करावी लागेल, एकंदरीत पणजी व ताळगावमधील कुत्रे तरी आता स्मार्ट होत आहेत, असे म्हणूया रस्ते किंवा शहर स्मार्ट झाले नाही, तरी कुत्र्यांची स्थिती सुधारतेय हेही नसे थोडके, पणजीत आतापर्यंत ८६ कुत्र्यांना मायक्रोचीप बसवली. 

आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी जाहीर केल्यानुसार ताळगावमध्ये कुत्र्यांना मायक्रोचीप लावण्याचे काम तीन ठिकाणी चालेल. त्यानंतर सांताक्रूझ मतदारसंघातही मायक्रोचीप मोहीम सुरू होईल. म्हणजे आपल्याही भागात कुत्रे स्मार्ट होतील याविषयी आमदार रुदोल्फ फर्नांडिस यांना आनंद वाटायला नको काय? मध्यंतरी ताळगावमध्ये अतिहिंसक कुत्र्याने दोन मुलांवर हल्ला केला. विदेशी जातीच्या अतिहिंसक कुत्र्यांवर बंदी लागू करावी, असे मुख्यमंत्री सावंत यांचे भव्यदिव्य स्वप्न आहे. हे स्वप्न स्वयंपूर्ण गोव्याहून मोठे आहे. आता बंदी कधी लागू होते, ते पाहूया.

 

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी