शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीचे गौडबंगाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 12:45 IST

पणजी शहर येत्या पावसाळ्यात बुडणार याची कल्पना सरकारला आली आहे.

जहाज बुडू लागले की, सर्वप्रथम उंदीर बाहेर उड्या टाकू लागतात. पणजी शहर येत्या पावसाळ्यात बुडणार याची कल्पना सरकारला आली आहे. सरकारमधील काही घटकांनी ओरड सुरू केली आहे. जहाजाचे कप्तान म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना वाऱ्याची दिशा कळली आहे. त्यामुळे त्यांनी संजीत रॉड्रिग्ज या अधिकाऱ्याकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाची धुरा सोपवली आहे. संजीतची नियुक्ती ही आता शेवटच्या टप्प्यात झाली आहे. एखादा रुग्ण मरणार याची कल्पना आल्यानंतर खास विमान पाठवून स्पेशालिस्ट बोलवला जातो, तसा काहीसा प्रकार संजीतबाबत सरकारने केला आहे. 

रॉड्रिग्ज यांना पणजी शहराची बरीच माहिती आहे. आता पावसाळ्यात पणजी बुडणार व लोक आपल्या नावाने शंख करणार याची कल्पना येताच संजीतला पाचारण केले गेले. शहर मरणाच्या दारात उभे असताना केवढेही तज्ज्ञ किंवा डॉक्टर्स बोलवले तरी शहराचा जीव वाचेलच याची हमी देता येत नाही. काल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पहिला बॉम्ब टाकला. स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असा दावा करत सल्लागारांच्या नावाने त्यांनी बॉम्ब फोडला. स्मार्ट सिटीच्या सल्लागाराला काहीही ज्ञान नाही; पण त्याला आठ कोटी रुपये सरकारकडून फेडले जात असल्याचा दावा बाबूशने केला आहे. मोन्सेरात पणजीचे आमदार आहेत. ते स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालकही आहेत. त्यांनी सल्लागाराला दोष दिला म्हणजे त्यांची जबाबदारी संपली, असा अर्थ होत नाही. पणजीची आज जी प्रचंड दुर्दशा झालेली आहे, त्याविषयी नागरिक बाबूश मोन्सेरात आणि पणजी महापालिकेवरही तेवढेच नाराज आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी खरे म्हणजे अगोदरच पणजीकडे लक्ष द्यायला हवे होते. 

सावंत व मोन्सेरात या दोघांनीही मिळून सातत्याने पणजीत फिरून दुर्दशा पाहायला हवी होती. मात्र, बांधकाममंत्री नीलेश काब्राल असोत, मुख्यमंत्री असोत किंवा आमदार मोन्सेरात असोत, तिन्ही नेते पणजीविषयी गंभीर नव्हतेच. एक वर्षापेक्षा जास्त काळ पणजी सगळीकडे फोडून ठेवली गेली आणि गोव्यात सरकारच अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती पणजीवासीयांनी अनुभवली. मनोहर पर्रीकर यांनी ज्या पणजी शहराचे अनेक वर्षे नेतृत्व केले, त्या शहराच्या वाट्याला आज नरकयातना आल्या आहेत. पणजीतील दुकानदार, मोठे व्यापारी, छोटे हॉटेल व्यावसायिक, हार्डवेअर विक्रेते यांचे धंदे ठप्प झाले आहेत. ग्राहक दुकानात येऊच शकत नाहीत. वाहन कुठे पार्क करावे, असा प्रश्न लोकांना पडतो. महापालिकेच्या पार्किंग कंत्राटदाराचा मीटर मात्र सुरूच आहे. पणजीत पाणी तुंबले तर आपण नव्हे, अभियंते जबाबदार असतील; असे विधान गेल्या महिन्यात मोन्सेरात यांनी केले होते. तेच विधान नंतर महापौर रोहित मोन्सेरात यांनी केले. काब्राल यांनीही हात झटकले आहेत.

मनोज काकुलो यांच्यासारखा उद्योगपतीही सातत्याने पणजीची दुर्दशा जाहीरपणे मांडत आला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यानंतरच परवा रात्रीच्यावेळी स्मार्ट सिटी कामांची पाहणी केली. पणजीत बाहेरून येणारे मोठे ट्रक रस्त्यात मध्येच रुततात किंवा कलंडतात. गटारे भरलेली आहेत. फुटपाथ फोडलेले आहेत. ठीक केलेले रस्ते पुन्हा फोडले जातात, पणजीतील भाजप कार्यकर्ते, नागरिक वगैरे पूर्वी आंदोलने करायचे, मात्र, आता अनेक जण सत्तेच्या मखमली, मऊशार गादीचा अनुभव घेत आहेत. पव्यावसायिक बोलण्यास घाबरतात. येत्या पावसाळ्यात सगळीकडे पाणी तुंबणार हे लोकांना ठाऊक झाले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आता ब्लेम गेम सुरू केला आहे. 

राज्याचे मुख्य सचिव श्री गोयल हे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे चेअरमन आहेत. मात्र, केबिनमधून बाहेर येऊन त्यांनी कधी पणजीची गंभीरपणे पाहणी केली असे दिसलेच नाही. पणजीतील नगरसेवकांनी तोंडाला कुलूप लावले आहे परिणाम लोकांनाच भोगावे लागतील. कारण १५ जूनपर्यंत पणजीतील कामे पूर्ण होणारच नाहीत, पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्ते पाण्याखाली गेले की, मग जहाज पूर्ण बुडालेच म्हणून लोकांनी समजावे. सरकार त्यावेळी मदतीला येणार नाही. आपण अगोदरच अभियंत्यांचा दोष म्हणून सांगितले होते, असे बाबूश मोन्सेरात पावसाळ्यात नव्याने बोलतील. स्मार्ट सिटीचे कॅमेरे, स्मार्ट सिटीची कामे वगैरे सगळेच गौडबंगाल आहे, हे वेगळे सांगायला नको.

 

टॅग्स :goaगोवा