शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

'स्मार्ट' प्रदूषणाची न्यायाधीशांकडून पाहणी; प्रशासनाची उडाली तारांबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2024 08:52 IST

सीईओंकडून घेतला कामांचा आढावा; उच्च न्यायालयात आज याचिकांवर सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राजधानी पणजीतील धुळ प्रदूषणाची दखल घेत अखेर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या न्यायधीशांनी स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली. स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्स यांच्याकडून न्यायधीशांनी कामाचा आढावा घेतला. विशेष म्हणजे न्यायधीशांकडून अशा प्रकारे पाहणी करण्याची ही पहिलीच घटना आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांमुळे निर्माण झालेल्या धुळ प्रदूषणाविरोधात नागरिकांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात आज, मंगळवारी २ रोजी सुनावणी होणार आहे. या याचिकांची गंभीर दखल घेऊन न्यायाधीशांनी सांतिनेझ जंक्शन, हिरो शोरुम, १८ जून मार्ग या परिसरात पाहणी केली. यावेळी सीईओ रॉड्रिग्स यांच्याकडून त्यांनी किती टक्के काम पूर्ण झाले, कामाची स्थिती, कधीपर्यंत काम पूर्ण होईल आदी माहिती दिली.

...रस्ते धुतले

न्यायधीश पाहणी करणार असल्याने शहरातील अनेक रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. पाण्याचे टँकर मागवून चक्क रस्ते धुवून काढले. पणजी मार्केट परिसराप्रमाणे अनेक भागांत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जेणे करुन या कामांमुळे होणारे धुळ प्रदूषण न्यायधीशांच्या नजरेस पडू नये. तसेच अनेक भागांमध्येही स्मार्ट सिटीचे काम बंद ठेवले होते. यावरुन या पाहणीवरुन प्रशासनाचा उडालेला गोंधळ स्पष्ट दिसून येत होता.

कठोर शिक्षा करा: काकुलो

स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी ३१ में ही डेडलाईन आहे. मात्र जर डेडलाईन पाळली नाही, तर स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आपण न्यायधीशांकडे केली आहे. या कामांमुळे लोकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यांना भाडे भरणेही मुश्किल बनत आहे. दोन वर्षांपासून या कामांच्या नावाखाली रस्ते खोदले जात आहेत. एकही रस्ता धड नसून वाहतुकीसाठी रस्ते बंद आहेत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून न्यायालय योग्य ते निर्देश देतील, अशी अपेक्षा उद्योजक मनोज काकुलो यांनी व्यक्त केली.

सीईओ भडकले

न्यायधीश कामांची पाहणी करणार असल्याने रस्ते धुतले का? असा प्रश्न करताच स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्स चांगलेच भडकले. आम्ही नियोजनानुसार सर्व कामे करीत आहोत. न्यायधीश  येणार म्हणून रस्ते धुहले नाहीत. पुरावे असले तरच आरोप करावेत, असेही ते म्हणाले. यावेळी उद्योजक मनोज काकुलो, सामाजिक कार्यकर्ते महेश म्हांग्रे व अन्य काही नागरिकांनी कामांबाबत न्यायाधीशांकडे चिंता व्यक्त केली. तसेच नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागत आहे, धूळ प्रदुषणामुळे लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हे त्यांनी त्यांच्या नजरस आणून दिले. 

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी