शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंपर्कामुळे राज्यातील परिस्थिती कळून येते: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:11 IST

व्यस्त विधानसभा अधिवेशन काळातही जनतेशी संवाद, समस्या जाणून उपाययोजनेसाठी अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : जनतेशी सातत्याने संपर्कात राहणे आवडते. त्यातून आपली ऊर्जा वाढते. राज्याच्या कानाकोपऱ्यात सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रांतील परिस्थिती जाणून घेण्यासाठी लोकांशी भेटून संवाद साधावा लागतो. त्यामुळे लोकांना न्याय देण्यासाठी जनता दरबार निश्चितच उपयुक्त ठरतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात आठवडाभर व्यस्त राहिल्यानंतरही मुख्यमंत्री सावंत शनिवारी साखळीतील जनता दरबारात उपस्थित होते. त्यांनी शेकडो लोकांबरोबर संवाद साधून समस्याही जाणून घेतल्या. १६ ते १८ तास काम करण्याची क्षमता ठेवत मुख्यमंत्री सातत्याने व्यग्र असल्याचे कार्यक्रमातून दिसून येते. आठवडाभर चाललेल्या विधानसभा अधिवेशनात अनेक प्रश्नांना सामोरे जाताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप ठेऊन अधिवेशनात सक्रिय सहभाग दाखविला. शनिवारी सकाळी ९ वाजण्यापूर्वीच मुख्यमंत्री जनता दरबारासाठी रवींद्र भवनात उपस्थित होते. 

सुमारे दीड तास लोकांना भेटून ते त्यांचे प्रश्न समजून घेत होते. नोकरी, सामाजिक प्रश्न, घरगुती समस्या, विविध योजनांची पूर्तता, तसेच अॅडमिशन व कार्यकर्त्याचे प्रश्न यांसह अनेक समस्या मुख्यमंत्री सातत्याने जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देताना दिसत होते.त्याच दिवशी सायंकाळी आलेल्या अर्जाची छाननी करून संबंधित खात्यांच्या माध्यमातून कामे तातडीने करण्यासाठी कर्मचारी सतत पाठपुरावा करतात. 

अनेक वेळा मुख्यमंत्री स्वतः फोन करून त्यावर लक्ष ठेवतात. यामुळे खऱ्या अर्थाने जनतेचा दरबार लोकाभिमुख आणि परिणामकारक ठरला आहे. गेल्या दोन वर्षाच्या जनता दरबाराचा आढावा घेतल्यास तातडीने प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्र्यांनी चांगले यश मिळविलेले दिसते. शनिवारी मुख्यमंत्र्यांना नवीन राज्यपालांच्या शपथविधीसाठी राजभवनात जायचे असल्याने त्यांनी सकाळीच कार्यकर्ते आणि जनतेची भेट घेण्यासाठी जनता दरबारात हजेरी लावली.

आमदार न्याय देण्यासाठी प्रयत्नशील

मुख्यमंत्री म्हणाले, की खोटी आश्वासने द्यायला आवडत नसले तरी जे शक्य आहे, त्याबाबत तातडीने शब्द देऊन त्याचा पाठपुरावा केला जातो. विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांचा अभ्यास योग्य प्रकारे होणे आवश्यक असते. या दृष्टीने सर्व आमदार प्रामाणिकपणे न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत