शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

लोकसंपर्कामुळे राज्यातील परिस्थिती कळून येते: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:11 IST

व्यस्त विधानसभा अधिवेशन काळातही जनतेशी संवाद, समस्या जाणून उपाययोजनेसाठी अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : जनतेशी सातत्याने संपर्कात राहणे आवडते. त्यातून आपली ऊर्जा वाढते. राज्याच्या कानाकोपऱ्यात सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रांतील परिस्थिती जाणून घेण्यासाठी लोकांशी भेटून संवाद साधावा लागतो. त्यामुळे लोकांना न्याय देण्यासाठी जनता दरबार निश्चितच उपयुक्त ठरतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात आठवडाभर व्यस्त राहिल्यानंतरही मुख्यमंत्री सावंत शनिवारी साखळीतील जनता दरबारात उपस्थित होते. त्यांनी शेकडो लोकांबरोबर संवाद साधून समस्याही जाणून घेतल्या. १६ ते १८ तास काम करण्याची क्षमता ठेवत मुख्यमंत्री सातत्याने व्यग्र असल्याचे कार्यक्रमातून दिसून येते. आठवडाभर चाललेल्या विधानसभा अधिवेशनात अनेक प्रश्नांना सामोरे जाताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप ठेऊन अधिवेशनात सक्रिय सहभाग दाखविला. शनिवारी सकाळी ९ वाजण्यापूर्वीच मुख्यमंत्री जनता दरबारासाठी रवींद्र भवनात उपस्थित होते. 

सुमारे दीड तास लोकांना भेटून ते त्यांचे प्रश्न समजून घेत होते. नोकरी, सामाजिक प्रश्न, घरगुती समस्या, विविध योजनांची पूर्तता, तसेच अॅडमिशन व कार्यकर्त्याचे प्रश्न यांसह अनेक समस्या मुख्यमंत्री सातत्याने जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देताना दिसत होते.त्याच दिवशी सायंकाळी आलेल्या अर्जाची छाननी करून संबंधित खात्यांच्या माध्यमातून कामे तातडीने करण्यासाठी कर्मचारी सतत पाठपुरावा करतात. 

अनेक वेळा मुख्यमंत्री स्वतः फोन करून त्यावर लक्ष ठेवतात. यामुळे खऱ्या अर्थाने जनतेचा दरबार लोकाभिमुख आणि परिणामकारक ठरला आहे. गेल्या दोन वर्षाच्या जनता दरबाराचा आढावा घेतल्यास तातडीने प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्र्यांनी चांगले यश मिळविलेले दिसते. शनिवारी मुख्यमंत्र्यांना नवीन राज्यपालांच्या शपथविधीसाठी राजभवनात जायचे असल्याने त्यांनी सकाळीच कार्यकर्ते आणि जनतेची भेट घेण्यासाठी जनता दरबारात हजेरी लावली.

आमदार न्याय देण्यासाठी प्रयत्नशील

मुख्यमंत्री म्हणाले, की खोटी आश्वासने द्यायला आवडत नसले तरी जे शक्य आहे, त्याबाबत तातडीने शब्द देऊन त्याचा पाठपुरावा केला जातो. विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांचा अभ्यास योग्य प्रकारे होणे आवश्यक असते. या दृष्टीने सर्व आमदार प्रामाणिकपणे न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत