शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

पर्यटकां अभावी शॅक व्यवसाय बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:58 IST

वाढत्या उकाड्यामुळे ऐन पर्यटनाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी झाली असल्याने राज्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचे परिणाम झाले आहेत.

म्हापसा : वाढत्या उकाड्यामुळे ऐन पर्यटनाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी झाली असल्याने राज्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचे परिणाम झाले आहेत. बहुतांश पर्यटकांचा ओढ थंड हवेच्या ठिकाणी असल्याने पर्यटकांच्या अभावी शॅक व्यवसायांनी आपला व्यवसाय गुंडाळायला सुरवात केली आहे तर काही व्यवसायिकांनी आपला व्यवसाय बंद सुध्दा केला आहे. शॅक कल्याण संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार ७० टक्के शॅक बंद करण्यात आले आहेत.  

राज्यात पर्यटन हंगाम्याला नोव्हेंबरात सुरवात होऊन पावसाळा दाखल होईपर्यंत सुरुच असतो. नोव्हेंबरात विदेशातून चार्टड विमाने दाखल व्हायला सुरवात झाल्यानंतर ख-या अर्थाने हंगाम्याला तेजी यायला लागते. दिवाळीत शाळांना पडणाºया सुट्ट्यांच्या दिवसात तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर देशी पर्यटक गोव्यात दाखल होत असतात. सलग सुट्ट्या आल्या तरी पर्यटक येत असतात. 

यंदा पावसाळा सुरु होण्यास काही दिवसांचा अवघी असला तरी या वर्षी मे महिन्याच्या सुरवातीलाच पर्यटन हंगाम्यावर पर्यटकांच्या अभावी परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. विदेशी पर्यटकाबरोबर देशी पर्यटकांची संख्या किनारी भागात अल्प अशी दिसून आली असून सध्या किनाºयावर दिसणाºया लोकात फक्त स्थानीकांचीच संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. 

काही व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा पर्यटन हंगाम्याच्या सुरवातीला पर्यटकांची संख्या समाधानकारक होती त्यामुळे व्यवसाय सुद्धा चांगला झाला होता पण काही दिवसापूर्वी समुद्राच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असून त्याची झळ व्यवसायाला पोहचली आहे. गोव्याऐवजी त्यांनी दुसºया थंडगार अशा पर्यटन स्थळी जाण्यास पसंदी दिली असल्याची माहिती व्यवसायिकांनी दिली. 

उत्तर गोव्यातील कांदोळी, कळंगुट, बागा, सिकेरी, वागातोर, हणजुण, हरमल, मोरजी सारख्या प्रसिद्ध किनाºयांवर शॅक व्यवसायिकांनी आवरा आवर करण्यास सुरवात केली आहे. अनेकांनी व्यवसाय गुडांळला असून काहिंनी आपला व्यवसाय मर्यादीत स्वरुपात सुरु ठेवला तर काहिंनी दिलेल्या माहितीनुसार पुढील रविवारपर्यंत प्रतिक्षा केल्यानंतर व्यवसाय बंद केला जाईल. त्यामुळे मे महिन्याच्या मध्यार्यंत किनाºयावरील शॅक व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता आहे. बंद करण्यात आलेल्या शॅकांवरील कामगार सुद्धा माघारी परतले आहेत. बहुतांश कामगार हे उत्तर भारतातील असतात. हंगामा सुरु होण्याच्या दिवसात नंतर ते पुन्हा दाखल होत असतात. 

कळंगुट किनारी परिसरात स्थानीक या दिवसात मोठ्या प्रमाणावर आंघोळ करण्यासाठी जात असतात. सहलींचे आयोजन सुध्दा केले जाते. त्यामुळे या दिवसात स्थानीकांची वर्दळ या भागात जास्त असल्याने सध्या इथल्या व्यवसायिकांचा व्यवसाय स्थानीकांवर अवलंबून राहिला आहे. त्याला मात्र काही प्रमाणावर गोव्यात आलेल्या देशी पर्यटकांची जोड लाभली आहे. 

शॅक कल्याण संघटनेचे अध्यक्ष कु्रज कार्दोज यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ७० टक्के व्यवसायिकांनी पर्यटकांच्या अभावी व्यवसाय बंद केला आहेत. राहिलेले व्यवसायीक २० में पर्यंत व्यवसाय बंद करतील. मागील काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी शॅक व्यवसायाला जास्त फटका बसला असल्याचे ते म्हणाले. व्यवसायावर परिणाम होण्यासाठी कारणे वेगळी असली तरी सुरु असलेला आपीएल, नोटबंदी व जीएसटीचे परिणाम अजुनपर्यंत व्यवसायावर पडलेले आहेत.