शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकां अभावी शॅक व्यवसाय बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:58 IST

वाढत्या उकाड्यामुळे ऐन पर्यटनाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी झाली असल्याने राज्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचे परिणाम झाले आहेत.

म्हापसा : वाढत्या उकाड्यामुळे ऐन पर्यटनाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी झाली असल्याने राज्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचे परिणाम झाले आहेत. बहुतांश पर्यटकांचा ओढ थंड हवेच्या ठिकाणी असल्याने पर्यटकांच्या अभावी शॅक व्यवसायांनी आपला व्यवसाय गुंडाळायला सुरवात केली आहे तर काही व्यवसायिकांनी आपला व्यवसाय बंद सुध्दा केला आहे. शॅक कल्याण संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार ७० टक्के शॅक बंद करण्यात आले आहेत.  

राज्यात पर्यटन हंगाम्याला नोव्हेंबरात सुरवात होऊन पावसाळा दाखल होईपर्यंत सुरुच असतो. नोव्हेंबरात विदेशातून चार्टड विमाने दाखल व्हायला सुरवात झाल्यानंतर ख-या अर्थाने हंगाम्याला तेजी यायला लागते. दिवाळीत शाळांना पडणाºया सुट्ट्यांच्या दिवसात तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर देशी पर्यटक गोव्यात दाखल होत असतात. सलग सुट्ट्या आल्या तरी पर्यटक येत असतात. 

यंदा पावसाळा सुरु होण्यास काही दिवसांचा अवघी असला तरी या वर्षी मे महिन्याच्या सुरवातीलाच पर्यटन हंगाम्यावर पर्यटकांच्या अभावी परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. विदेशी पर्यटकाबरोबर देशी पर्यटकांची संख्या किनारी भागात अल्प अशी दिसून आली असून सध्या किनाºयावर दिसणाºया लोकात फक्त स्थानीकांचीच संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. 

काही व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा पर्यटन हंगाम्याच्या सुरवातीला पर्यटकांची संख्या समाधानकारक होती त्यामुळे व्यवसाय सुद्धा चांगला झाला होता पण काही दिवसापूर्वी समुद्राच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असून त्याची झळ व्यवसायाला पोहचली आहे. गोव्याऐवजी त्यांनी दुसºया थंडगार अशा पर्यटन स्थळी जाण्यास पसंदी दिली असल्याची माहिती व्यवसायिकांनी दिली. 

उत्तर गोव्यातील कांदोळी, कळंगुट, बागा, सिकेरी, वागातोर, हणजुण, हरमल, मोरजी सारख्या प्रसिद्ध किनाºयांवर शॅक व्यवसायिकांनी आवरा आवर करण्यास सुरवात केली आहे. अनेकांनी व्यवसाय गुडांळला असून काहिंनी आपला व्यवसाय मर्यादीत स्वरुपात सुरु ठेवला तर काहिंनी दिलेल्या माहितीनुसार पुढील रविवारपर्यंत प्रतिक्षा केल्यानंतर व्यवसाय बंद केला जाईल. त्यामुळे मे महिन्याच्या मध्यार्यंत किनाºयावरील शॅक व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता आहे. बंद करण्यात आलेल्या शॅकांवरील कामगार सुद्धा माघारी परतले आहेत. बहुतांश कामगार हे उत्तर भारतातील असतात. हंगामा सुरु होण्याच्या दिवसात नंतर ते पुन्हा दाखल होत असतात. 

कळंगुट किनारी परिसरात स्थानीक या दिवसात मोठ्या प्रमाणावर आंघोळ करण्यासाठी जात असतात. सहलींचे आयोजन सुध्दा केले जाते. त्यामुळे या दिवसात स्थानीकांची वर्दळ या भागात जास्त असल्याने सध्या इथल्या व्यवसायिकांचा व्यवसाय स्थानीकांवर अवलंबून राहिला आहे. त्याला मात्र काही प्रमाणावर गोव्यात आलेल्या देशी पर्यटकांची जोड लाभली आहे. 

शॅक कल्याण संघटनेचे अध्यक्ष कु्रज कार्दोज यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ७० टक्के व्यवसायिकांनी पर्यटकांच्या अभावी व्यवसाय बंद केला आहेत. राहिलेले व्यवसायीक २० में पर्यंत व्यवसाय बंद करतील. मागील काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी शॅक व्यवसायाला जास्त फटका बसला असल्याचे ते म्हणाले. व्यवसायावर परिणाम होण्यासाठी कारणे वेगळी असली तरी सुरु असलेला आपीएल, नोटबंदी व जीएसटीचे परिणाम अजुनपर्यंत व्यवसायावर पडलेले आहेत.