शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, शिवसेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 13:43 IST

गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

पणजी : गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. राज्य नेतृत्त्वहीन बनले असून जनता हवालदिल झाली असल्याचे पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा प्रवक्त्या राखी नाईक यांनी म्हटले आहे. नाईक म्हणतात की, सरकारात घटक असलेल्या गोवा फॉरवर्डचे नेते नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी स्वत:च राज्यात आणीबाबणीसदृश स्थिती असल्याचे विधान केल्याने सर्व काही स्पष्ट होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे वैद्यकीय उपचारानिमित्त सध्या अमेरिकेत असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत राज्य नेतृत्त्वहीन बनले आहे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच पर्याय आहे. 

खाणबंदी तसेच इतर गंभीर समस्या राज्यासमोर असताना राज्याला नेतृत्त्व नसल्याने जनतेच्या प्रश्नांवर बोलणाराही कोणी नाही. १६ मार्चपासून खाणी बंद होणार असल्याने खाणींवरील कामगार, ट्रकमालक, बार्जवाले सर्व संकटात आहेत. त्यांना खोटी आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे. पर्रीकर यांनी स्थापन केलेल्या तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार गटाकडून या प्रश्नावर तोडग्याची अपेक्षा करता येणार नाही. कोणत्याही प्रश्नावर या तिघांमध्ये मतैक्य होणे अशक्य आहे कारण या तिघांची विचारसरणी भिन्न असल्याचे राखी नायक म्हणतात. त्यामुळे या मंत्रिगटाने अजून खाणींच्या प्रश्नावर एकही बैठक घेतलेली नाही. 

पर्रीकरांच्या अनुपस्थितीत भाजप नेत्यांवर लोक अवलंबून राहू शकत नाहीत कारण हे नेते तेवढे कार्यक्षमही नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, जेणेकरुन केंद्राच्या हातात सत्ता जाईल आणि गोव्यातील जनतेलाही दिलासा मिळेल. खास करुन खाण भागातील लोकांना दिलासा मिळेल, असे  नाईक यांनी म्हटले आहे. गोव्यात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. शिवसेना हा राज्यातील लहान पक्ष असला तरी सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सेनेने केलेल्या या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरShiv Senaशिवसेना