शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, शिवसेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 13:43 IST

गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

पणजी : गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. राज्य नेतृत्त्वहीन बनले असून जनता हवालदिल झाली असल्याचे पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा प्रवक्त्या राखी नाईक यांनी म्हटले आहे. नाईक म्हणतात की, सरकारात घटक असलेल्या गोवा फॉरवर्डचे नेते नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी स्वत:च राज्यात आणीबाबणीसदृश स्थिती असल्याचे विधान केल्याने सर्व काही स्पष्ट होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे वैद्यकीय उपचारानिमित्त सध्या अमेरिकेत असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत राज्य नेतृत्त्वहीन बनले आहे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच पर्याय आहे. 

खाणबंदी तसेच इतर गंभीर समस्या राज्यासमोर असताना राज्याला नेतृत्त्व नसल्याने जनतेच्या प्रश्नांवर बोलणाराही कोणी नाही. १६ मार्चपासून खाणी बंद होणार असल्याने खाणींवरील कामगार, ट्रकमालक, बार्जवाले सर्व संकटात आहेत. त्यांना खोटी आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे. पर्रीकर यांनी स्थापन केलेल्या तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार गटाकडून या प्रश्नावर तोडग्याची अपेक्षा करता येणार नाही. कोणत्याही प्रश्नावर या तिघांमध्ये मतैक्य होणे अशक्य आहे कारण या तिघांची विचारसरणी भिन्न असल्याचे राखी नायक म्हणतात. त्यामुळे या मंत्रिगटाने अजून खाणींच्या प्रश्नावर एकही बैठक घेतलेली नाही. 

पर्रीकरांच्या अनुपस्थितीत भाजप नेत्यांवर लोक अवलंबून राहू शकत नाहीत कारण हे नेते तेवढे कार्यक्षमही नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, जेणेकरुन केंद्राच्या हातात सत्ता जाईल आणि गोव्यातील जनतेलाही दिलासा मिळेल. खास करुन खाण भागातील लोकांना दिलासा मिळेल, असे  नाईक यांनी म्हटले आहे. गोव्यात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. शिवसेना हा राज्यातील लहान पक्ष असला तरी सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सेनेने केलेल्या या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरShiv Senaशिवसेना