शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

अनियंत्रित मासेमारी रोखण्यासाठी पाळत ठेवून डेटा सामायिक करा - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

By किशोर कुबल | Updated: October 30, 2023 19:25 IST

चांचेगिरी, दहशतवाद, ड्रग्स तस्करींचा सामना करण्यासाठी बहुराष्ट्रीय सहयोग चौकट हवी.

पणजी : अवैध तसेच विनापरवाना आणि अनियंत्रित मासेमारीची समस्या सोडविण्‍यासाठी पाळत ठेवून डेटा सामायिक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले. गोवा सागरी परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारताचे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार, तसेच बांग्लादेश, कोमोरोस, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मॉरिशस, यासह हिंदी महासागरातील १२ राष्ट्रांचे सागरी दलांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत.

हवामान बदलाविषयी सहयोगात्मक चौकटीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करणे  आणि शाश्वत पद्धतींचा स्वीकार करण्यासाठी देशांनी  एकत्रित येऊन  काम करता येईल, असे सिंह म्हणाले. अनिर्बंध  मासेमारीबरोबरच समुद्री चाचेगिरी, हवामान बदल, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, आणि सागरी  वाणिज्य स्वातंत्र्य यासारख्या सामायिक सागरी आव्हानांचा प्रभावी सामना करण्यासाठी हिंद महासागर क्षेत्रात बहुराष्ट्रीय सहयोग चौकट  स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सागरी प्रदेशाची सुरक्षितता  समृद्धता कमी  करण्यासारख्‍या  स्वार्थी हितसंबंध टाळून सर्वांचे  सहकार्य असले पाहिजे;  यावर राजनाथ सिंह यांनी  जोर दिला. आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचा आदर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. सागरी नियमांचे पालन करण्यास वचनबद्ध केल्याशिवाय आपली  समान सुरक्षा आणि समृद्धी जपली जाऊ शकत नाही कोणत्याही एका देशाने इतरांवर वर्चस्व गाजवू नये याची खात्री करण्यासाठी प्रतिबद्धतेचे वाजवी नियम महत्त्वाचे आहेत,” असेही  ते म्हणाले.

सिंह पुढे म्हणाले कि,‘हरित अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी सर्व देशांनी स्वीकारली आणि गरजू देशांसोबत तंत्रज्ञान आणि भांडवल सामायिक केले तर जग या समस्येवर मात करू शकेल.’ संसाधनांच्या बेसुमार वापराचे आव्हान असलेल्या बेकायदेशीर, नोंद नसलेल्या आणि नियमन नसलेल्या मासेमारीचा संदर्भ देताना सिंह म्हणाले की, अशा प्रकारची मासेमारी सागरी परिसंस्था आणि शाश्वत मत्स्यपालन धोक्यात आणते. यामुळे आपली आर्थिक सुरक्षा आणि प्रादेशिक आणि जागतिक अन्न सुरक्षादेखील धोक्यात आली आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी याप्रसंगी बोलताना हिंद महासागर क्षेत्रात  शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी या  क्षेत्रातील देशांमध्ये सहकार्यासाठी आवाहन केले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी आपल्या भाषणात  पारंपरिक व  अपारंपरिक सागरी धोक्यांच्या बदलत्या स्वरूपावर  भर दिला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहgoaगोवा