शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

अनियंत्रित मासेमारी रोखण्यासाठी पाळत ठेवून डेटा सामायिक करा - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

By किशोर कुबल | Updated: October 30, 2023 19:25 IST

चांचेगिरी, दहशतवाद, ड्रग्स तस्करींचा सामना करण्यासाठी बहुराष्ट्रीय सहयोग चौकट हवी.

पणजी : अवैध तसेच विनापरवाना आणि अनियंत्रित मासेमारीची समस्या सोडविण्‍यासाठी पाळत ठेवून डेटा सामायिक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले. गोवा सागरी परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारताचे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार, तसेच बांग्लादेश, कोमोरोस, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मॉरिशस, यासह हिंदी महासागरातील १२ राष्ट्रांचे सागरी दलांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत.

हवामान बदलाविषयी सहयोगात्मक चौकटीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करणे  आणि शाश्वत पद्धतींचा स्वीकार करण्यासाठी देशांनी  एकत्रित येऊन  काम करता येईल, असे सिंह म्हणाले. अनिर्बंध  मासेमारीबरोबरच समुद्री चाचेगिरी, हवामान बदल, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, आणि सागरी  वाणिज्य स्वातंत्र्य यासारख्या सामायिक सागरी आव्हानांचा प्रभावी सामना करण्यासाठी हिंद महासागर क्षेत्रात बहुराष्ट्रीय सहयोग चौकट  स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सागरी प्रदेशाची सुरक्षितता  समृद्धता कमी  करण्यासारख्‍या  स्वार्थी हितसंबंध टाळून सर्वांचे  सहकार्य असले पाहिजे;  यावर राजनाथ सिंह यांनी  जोर दिला. आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचा आदर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. सागरी नियमांचे पालन करण्यास वचनबद्ध केल्याशिवाय आपली  समान सुरक्षा आणि समृद्धी जपली जाऊ शकत नाही कोणत्याही एका देशाने इतरांवर वर्चस्व गाजवू नये याची खात्री करण्यासाठी प्रतिबद्धतेचे वाजवी नियम महत्त्वाचे आहेत,” असेही  ते म्हणाले.

सिंह पुढे म्हणाले कि,‘हरित अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी सर्व देशांनी स्वीकारली आणि गरजू देशांसोबत तंत्रज्ञान आणि भांडवल सामायिक केले तर जग या समस्येवर मात करू शकेल.’ संसाधनांच्या बेसुमार वापराचे आव्हान असलेल्या बेकायदेशीर, नोंद नसलेल्या आणि नियमन नसलेल्या मासेमारीचा संदर्भ देताना सिंह म्हणाले की, अशा प्रकारची मासेमारी सागरी परिसंस्था आणि शाश्वत मत्स्यपालन धोक्यात आणते. यामुळे आपली आर्थिक सुरक्षा आणि प्रादेशिक आणि जागतिक अन्न सुरक्षादेखील धोक्यात आली आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी याप्रसंगी बोलताना हिंद महासागर क्षेत्रात  शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी या  क्षेत्रातील देशांमध्ये सहकार्यासाठी आवाहन केले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी आपल्या भाषणात  पारंपरिक व  अपारंपरिक सागरी धोक्यांच्या बदलत्या स्वरूपावर  भर दिला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहgoaगोवा