शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

एसईझेड गेले, गोव्यात आता दोन सीईझेड, केंद्राचा प्रस्ताव जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 21:24 IST

राज्यात एसईझेडला स्थान दिले जाऊ नये म्हणून गोमंतकीयांनी मोठे आंदोलन केले व मग सर्व एसईझेड दिगंबर कामत सरकारच्या काळात रद्द करून टाकले गेले होते. मात्र देशभरात एकूण चौदा सीईझेड केंद्राकडून अस्तित्वात आणले जाणार असून त्यात गोव्यातीलही दोन सीईझेडचा समावेश आहे.

पणजी : राज्यात एसईझेडला स्थान दिले जाऊ नये म्हणून गोमंतकीयांनी मोठे आंदोलन केले व मग सर्व एसईझेड दिगंबर कामत सरकारच्या काळात रद्द करून टाकले गेले होते. मात्र देशभरात एकूण चौदा सीईझेड केंद्राकडून अस्तित्वात आणले जाणार असून त्यात गोव्यातीलही दोन सीईझेडचा समावेश आहे. उत्तर व दक्षिण गोव्यात मिळून दोन सीईङोड तयार केले जातील असे केंद्र सरकारकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे.

सागरमाला प्रकल्पांतर्गत किनारपट्टीतील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची निवड सीईझेडसाठी करण्यात आली आहे. सीईझेडसाठी देशातील चौदा जागे निवडले गेले आहेत. गुजरातमध्ये तीन, तामिळनाडूत तीन तसेच आंध्र प्रदेशमध्ये दोन सीईझेड अस्तित्वात आणले जाणार आहेत, असे केंद्र सरकारच्या प्रस्तावात म्हटले आहे. 

सागरमालाचा जो राष्ट्रीय परस्पेक्टीव प्लॅन तयार करण्यात आला आहे, त्यात गोव्यातीलही दोन सीईङोडचा समावेश आहे. विशेष म्हणजे गोव्यासह देशातील चौदाही सीईङोडबाबतची योजना राज्य सरकार व केंद्र सरकारने चर्चा करून तयार केली असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. महाराष्ट्रात केवळ एकच सीईङोड येईल. रत्नागिरीमध्ये हा सीईङोड अस्तित्वात येईल असेही केंद्राने जाहीर केले आहे. दक्षिण कोकणपट्टीत एकूण तीन सीईझेड तयार होतील व त्यात गोव्यातील दोन सीईङोडचा समावेश आहे. रिफायनिंग, पोलाद व अन्न प्रक्रिया अशा उद्योगांना नजरेसमोर ठेवून या तीन सीईङोडचा विचार करण्यात आला आहे. बंदर आधारित औद्योगिकरणाला चालना द्यावी व त्यातून रोजगार संधी निर्माण कराव्यात असा केंद्राचा हेतू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय जहाजोद्योग व अर्थ राज्यमंत्री राधाकृष्णन यांनी याविषयीची माहिती लोकसभेत लेखी उत्तराद्वारे सादर केली आहे. 

दरम्यान, गोव्यात आताच कोळसा हाताळणी, जलमार्गाचे राष्ट्रीयीकरण अशा प्रकल्पांना मोठा विरोध होतो. यापूर्वी एसईङोडना लोकांनी पिटाळून लावले आहे. त्यामुळे आता सीईङोडबाबत गोमंतकीय गप्प राहतील का असा प्रश्न निर्माण होत आहे. सीईङोड गोव्यात विकसित करण्याविषयी गोवा सरकारशी केंद्र सरकारने चर्चा केली तरी कधी व सागरमाला प्रकल्पाच्या योजनेत गोव्यातील सीईङोडची योजना समाविष्ट केंद्र सरकारने केली तरी कधी अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होत आहे. हे सगळे प्रश्न आता चर्चेस येणार आहेत.

टॅग्स :goaगोवा