शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

एसईझेड गेले, गोव्यात आता दोन सीईझेड, केंद्राचा प्रस्ताव जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 21:24 IST

राज्यात एसईझेडला स्थान दिले जाऊ नये म्हणून गोमंतकीयांनी मोठे आंदोलन केले व मग सर्व एसईझेड दिगंबर कामत सरकारच्या काळात रद्द करून टाकले गेले होते. मात्र देशभरात एकूण चौदा सीईझेड केंद्राकडून अस्तित्वात आणले जाणार असून त्यात गोव्यातीलही दोन सीईझेडचा समावेश आहे.

पणजी : राज्यात एसईझेडला स्थान दिले जाऊ नये म्हणून गोमंतकीयांनी मोठे आंदोलन केले व मग सर्व एसईझेड दिगंबर कामत सरकारच्या काळात रद्द करून टाकले गेले होते. मात्र देशभरात एकूण चौदा सीईझेड केंद्राकडून अस्तित्वात आणले जाणार असून त्यात गोव्यातीलही दोन सीईझेडचा समावेश आहे. उत्तर व दक्षिण गोव्यात मिळून दोन सीईङोड तयार केले जातील असे केंद्र सरकारकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे.

सागरमाला प्रकल्पांतर्गत किनारपट्टीतील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची निवड सीईझेडसाठी करण्यात आली आहे. सीईझेडसाठी देशातील चौदा जागे निवडले गेले आहेत. गुजरातमध्ये तीन, तामिळनाडूत तीन तसेच आंध्र प्रदेशमध्ये दोन सीईझेड अस्तित्वात आणले जाणार आहेत, असे केंद्र सरकारच्या प्रस्तावात म्हटले आहे. 

सागरमालाचा जो राष्ट्रीय परस्पेक्टीव प्लॅन तयार करण्यात आला आहे, त्यात गोव्यातीलही दोन सीईङोडचा समावेश आहे. विशेष म्हणजे गोव्यासह देशातील चौदाही सीईङोडबाबतची योजना राज्य सरकार व केंद्र सरकारने चर्चा करून तयार केली असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. महाराष्ट्रात केवळ एकच सीईङोड येईल. रत्नागिरीमध्ये हा सीईङोड अस्तित्वात येईल असेही केंद्राने जाहीर केले आहे. दक्षिण कोकणपट्टीत एकूण तीन सीईझेड तयार होतील व त्यात गोव्यातील दोन सीईङोडचा समावेश आहे. रिफायनिंग, पोलाद व अन्न प्रक्रिया अशा उद्योगांना नजरेसमोर ठेवून या तीन सीईङोडचा विचार करण्यात आला आहे. बंदर आधारित औद्योगिकरणाला चालना द्यावी व त्यातून रोजगार संधी निर्माण कराव्यात असा केंद्राचा हेतू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय जहाजोद्योग व अर्थ राज्यमंत्री राधाकृष्णन यांनी याविषयीची माहिती लोकसभेत लेखी उत्तराद्वारे सादर केली आहे. 

दरम्यान, गोव्यात आताच कोळसा हाताळणी, जलमार्गाचे राष्ट्रीयीकरण अशा प्रकल्पांना मोठा विरोध होतो. यापूर्वी एसईङोडना लोकांनी पिटाळून लावले आहे. त्यामुळे आता सीईङोडबाबत गोमंतकीय गप्प राहतील का असा प्रश्न निर्माण होत आहे. सीईङोड गोव्यात विकसित करण्याविषयी गोवा सरकारशी केंद्र सरकारने चर्चा केली तरी कधी व सागरमाला प्रकल्पाच्या योजनेत गोव्यातील सीईङोडची योजना समाविष्ट केंद्र सरकारने केली तरी कधी अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होत आहे. हे सगळे प्रश्न आता चर्चेस येणार आहेत.

टॅग्स :goaगोवा