शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मासळी प्रश्नावर तोडगा काढा अन्यथा मार्केट बंद पाडू, म्हापसा विक्रेत्यांची संघटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 13:17 IST

मासळीच्या आयातीवर लागू केलेल्या बंदीचा, आरोग्य मंत्र्याचा म्हापशातील मासळी विक्रेत्या संघटनेने निषेध करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

म्हापसा - मासळीच्या आयातीवर लागू केलेल्या बंदीचा, आरोग्य मंत्र्याचा म्हापशातील मासळी विक्रेत्या संघटनेने निषेध करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुढील १५ दिवसात आयातीच्या प्रश्नावर तोडगा न काढल्यास मार्केट बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. 

मासळीच्या आयातीवर लागू केलेल्या बंदीचा निषेध करण्यासाठी म्हापशातील मासळी विक्रेत्या संघटनेने गुरुवारी सकाळी मार्केटमध्ये निदर्शने केली. यावेळी १०० हून जास्त मासळी विक्रेत्या उपस्थित होत्या. म्हापशात मासळी विक्रेत्यांच्या संघटनेत सुमारे हजाराहून जास्त सदस्य नोंद झाले आहेत. निदर्शनात आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचा निषेध करण्यात आला. मासळीच्या प्रश्नावर राणे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे असंख्य विक्रेत्यांच्या पोटावर त्यांनी घाला घातला असल्याचा आरोप संघटनेच्या अध्यक्षा शशिकला गोवेकर यांनी केला. लोकांनी चांगली मासळी सुद्धा विकत घेणे बंद केले असल्याने त्याचे विपरीत परिणाम सर्वांना भोगावे लागत असल्याचे यावेळी सांगितले. सरकारला जर मासळीत फॉर्मेलिन असल्याचा संशय असल्यास त्यांनी मासळीच्या दर्जाची छाननी जरुर  करावी. त्यासाठी मडगावात तसेच म्हापशात तपासणीसाठी कार्यालय थाटण्याची मागणी केली पण आयातीवर बंदी लागू करु नये असेही मत व्यक्त  केले.  मासळी विक्रेत्यांवर टिका करणारे आमदार तथा माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांच्यावर सुद्धा संघटनेनी टिका केली. दुसऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या आलेमाव हे स्वत:पुरता विचार करतात असेही त्या म्हणाल्या. विक्रेत्यांना कारागृहात बंद करण्याची मागणी करणाऱ्या आलेमाव यांना कोलवाळ येथील कारागृत स्वत: बसण्याची पाळी आली होते याचा त्यांना विसर पडला असल्याचे सांगितले. 

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात दिवसा किमान ३० वाहने मासळी घेवून येतात. त्यातील बहुतांश मडगावला तर काही म्हापशात असतात. या मासळीच्या दर्जासंबंधी संशय असल्यास त्याची जरुर तपासणी करावी अशीही मागणी गोवेकर यांनी यावेळी केली. येणाºया या मासळीमुळे इथल्या लोकांची गरज भागवली जाते अशीही माहिती यावेळी दिली. 

राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सध्या आजारी आहेत. त्यांच्या गैरहजेरीत मासळीच्या प्रश्नावरुन काही लोकांकडून ताणला गेला जात असून त्यांची तब्बेत व्यवस्थित असती तर सध्याचा वाद उद्भवलाच नसता असेही गोवेकर म्हणाल्या; पण वारंवार पक्ष बदलणाऱ्या  राजकारण्यांकडून मासळीचा प्रश्न ताणला जात असल्याचे केलेल्या आरोपात यावेळी सांगितले.  

टॅग्स :goaगोवाFishermanमच्छीमार