शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कळंगुटमधील पुतळा हटवणे हाच सिक्वेरांचा उद्देश; शिवस्वराज्य समितीचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 10:42 IST

शिवप्रेमींनी संयम राखावा.

लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादात सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी आपला हट्ट बाजूला ठेवावा. महाराजांनी ज्या प्रकारे शासन चालवले, त्यापासून धडा घेऊन आपले शासन चालवावे. त्यांनी जे केले आहे, त्याला माफी नाही. त्यांच्या मनात महाराजांचा पुतळा हटवणे हेच असल्याने ते आपल्या विधानात वारंवार बदल करीत आहेत, असा आरोप शिवस्वराज्य समितीकडून करण्यात आला.

कळंगुट येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या पत्रकार समितीकडून ही माहिती देण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मठकर, सुदेश मयेकर, सिद्धीक गोवेकर तसेच प्रज्योत कळंगुटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

जमीनदोस्त आणि हटवणे तसेच चूक मागणे आणि माफी मागणे या शब्दांतील फरक त्यांनी जाणून घेण्याची गरज आहे. सिक्वेरा फक्त शब्दांचा खेळ करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांना जर भाषेचे ज्ञान असते, तर शब्दांतील फरक त्यांना समजून आला असता. त्यामुळे त्यांना इंग्रजी पुन्हा शिकून घेण्याची गरज आहे, असे मयेकर म्हणाले.

नव्या जागी पुतळ्याच्या उभारणीसाठी सिक्वेरांना जर पर्याय घ्यायचा असेल तर कळंगुट क्षेत्रात चार सर्कल आहेत त्यातील एक जागा शिवप्रेमींना उपलब्ध करून देण्यात यावी. तसे करण्यापूर्वी सिक्वेरांनी शिवप्रेमींना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे मत मयेकर यांनी व्यक्त केले.

हा विषय संवेदनशील असल्याने पंचायतीकडून समितीला पत्र पाठवण्यापूर्वी पत्रामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार होणे गरजेचे होते. पुतळ्यासाठी गावातील लोकांकडून निधी उभारण्यात आला होता. याची जाण सिक्वेरांना होती. तसेच पुतळ्याची उभारणी करण्यापूर्वी पूर्ण गावाला त्याची माहिती होती. लोकांना विश्वासात घेण्यात आले होते, असे मयेकर म्हणाले.

पुतळ्याची उभारणी घाईगडबडीत करण्यात आली, हा आरोप शिवस्वराज्य संस्थेकडून फेटाळण्यात आला. सिक्वेरा यांनी सप्टेंबरमध्ये त्याची माहिती देण्यात आली, असेही सांगण्यात आले. त्यांनी त्याची दखल घेतली नाही किंवा संबंधित खात्याला पाठवले नाही.

पंचायतीला सादर केलेल्या प्रस्तावानंतर सिक्वेरांनी हायमास्ट दिव्याची उभारणी करण्यासाठी घाईगडबडीने खोदकाम आरंभले. प्रस्तावानंतर गडबड करण्याचे कारण काय होते? असा प्रश्न करून त्यातून त्यांच्या मनात काय होते, ते स्पष्ट होते. महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी पंचायतीकडून असहकार्य केले.

जेथे त्यांनी वाहतूक बेटाच्या उभारणीसाठी खोदकाम सुरू केले होते ती जागा पायाभूत महामंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. पंचायतीची नसल्याचेही निदर्शनाला आणून देण्यात आले. पुतळ्याची उभारणी करून २३ दिवस पूर्ण झाले. अद्याप एकही अपघात घडला नाही किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला नाही. वाहतुकीला त्रास होत असल्यास संबंधित खात्यांनी येऊन पाहणी करावी, असे आवाहन मयेकर यांनी केले.

सिक्वेरा यांनी शिवस्वराज्य समितीला दिलेल्या दोषाचे समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मठकर यांनी खंडन केले. समितीने कोणतेच बेकायदेशीर कृत्य केले नाही. त्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे सांगण्यात आले.

पत्र मागे घेण्यात आले नसल्याचे सिक्वेरा यांनी केलेले विधान दिशाभूल करणारे आहे. ते फक्त खोटे बोलतात. त्याला शिवप्रेमींनी बळी पडू नये, असेही आवाहन मठकर यांनी केले.

पुतळा हटवण्यासाठी दिलेला आदेश मागे घेणे शक्य नाही. या मुद्यावर कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनेच्या दिवशी आपण माफी मागितली आहे. पंचायतीने घेतलेल्या निर्णयावर आपण कायम राहणार आहे. - जोसफ सिक्वेरा, सरपंच कळंगुट

टॅग्स :goaगोवाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज