शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाण्यासाठी स्वतंत्र खाते: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 12:12 IST

जलाशयापर्यंत पाणी आणून देण्याची जबाबदारी जलस्रोत खात्याची; बेजबाबदार अभियंत्यांवर कारवाई करू

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सार्वजनिक बांधकाम  खात्याचे विभाजन करून पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र खाते स्थापन करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. जलाशयापर्यंत पाणी आणून देणे ही जबाबदारी यापुढे जलस्रोत खात्याची असेल. या कामात कसूर करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

दररोज किमान चार तास पाणी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पर्वरी येथे बुधवारी जलकुंभाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कार्यक्रमास स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जिल्हा पंचायत सदस्य तसेच पंच सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली

मुख्यमंत्री म्हणाले की, स्वतंत्र पाणी खाते लवकरच अस्तित्वात येईल. पाण्यासाठी लोकांची परवड होणार नाही. सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत सध्या रस्ते, इमारती व पाणी विभाग येतो. रस्ते तसेच इतर कामांवरच जास्त लक्ष दिले जात असल्याने पाणीपुरवठा विभागाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सरकारने स्वतंत्र खाते स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील २५ वर्षांचे नियोजन केले जाईल. गोवा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला हवा, यासाठी नवनवीन जलस्रोत शोधण्याचे काम सुरू आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, महिना १६ हजार लिटरपर्यंत मोफत पाण्याचा सरकारने दिलेल्या सवलतीचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. त्यामुळे ४० टक्के कुटुंबांना शून्य पाणी बिल येत आहे. सरकार प्रत्येक कुटुंबाला प्रतिक्युबिक लिटर १७ रुपये तोटा सहन करून पाणी देत आहे. सरकारला प्रतिक्युबिक लिटर २० रुपये खर्च येतो. परंतु, आम्ही लोकांना ते केवळ ३ रुपये क्युबिक लिटर दराने देतो. लोकांना गृह आधार, लाडली लक्ष्मी किंवा इतर कल्याणकारी योजनांचे पैसे दिसतात. सरकार मोफत पाणी देते याकडे मात्र दुर्लक्ष होते. लोकांनी पाण्याचा वापर जपून करायला हवा. पाणी वाया घालवू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

'तिळारी'वर किती काळ अवलंबून राहणार?

तिळारी प्रकल्पावर गोवा राज्याने किती काळ अवलंबून राहायचे, असा प्रश्न करून मुख्यमंत्री म्हणाले की, तिळारीचे कालवे फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. कुडासे, दोडामार्ग येथे कालवा फुटल्यानंतर गोवा सरकारला तो दुरुस्त करावा लागला. लोक पाणी मिळाले नाही की सरकारला दोष देतात. वस्तुस्थिती समजून घेत नाहीत. हे कालवे अत्यंत जुने झालेले आहेत, त्यामुळे फुटतात. गोव्यातच नवे जलस्रोत शोधून ते उपयोगात आणण्यासाठी सरकारचे आता प्राधान्य राहणार आहे.

कोमुनिदादींनी सरकारला विकासकामांसाठी जमिनी द्यायला हव्यात. किटला, साल्वादोर दु मुंद कोमुनिदादींनी जमिनी दिल्या म्हणून हा प्रकल्प आम्ही पूर्ण करू शकलो. राज्यातील अन्य कोमुनिदादींनीही याचा आदर्श घ्यावा. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत