शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

गोव्यात अतिरेकी शिरण्याचा तो 'अलर्ट' खोटा; सागर कवच प्रात्यक्षिकाचा होता भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 21:36 IST

या पार्श्वभूमीवर शेतकरी, वॉटर स्पोर्ट संचालकांना आणि जहाज मालकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

पणजी:  गोव्यात समुद्रमार्गे अतिरेकी शिरण्याची शक्यता आहे. तटरक्षक दलाने आणि समुद्रात संचार करणाऱ्यांनी सतर्क रहावे, असा अलर्ट गुप्तचर विभागाकडून देण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी, वॉटर स्पोर्ट संचालकांना आणि जहाज मालकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आज संध्याकाळी हा अलर्ट खोटा असल्याचे निष्पन्न झाले. राज्यात सागर कवच प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली आहेत. समद्रमार्गे आत शिरणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. कॅप्टन ऑफ पोर्टस, तटरक्षक दल आणि किनारा पोलीस विभागाकडून संयुक्तरित्या या कारवाया सुरू आहेत. याच प्रात्यक्षिकांचा भाग म्हणून आज सकाळी अतिरेकी गोव्यात घुसण्याचा अलर्ट जारील करण्यात आला होता. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी तशी माहिती पत्रकार व इतरांना पहिल्या दिवशी दिली नसल्यामुळे खरोखरच अतिरेकी अलर्ट आहे की काय, असे अनेक लोकांना वाटले. खरी गोष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी 'दैनिक लोकमत'चा फोन दिवसभर खणखणत होता. काही वृत्तपत्रांनी अतिरेकी अलर्टच्या बातम्याही छापून आणल्यामुळे या गोंधळात आणखी भर पडला. विशेष म्हणजे पोलिस खात्याला कोणताही अलर्ट नाही आणि कॅप्टन ऑफ पोर्ट व तटरक्षक दलाला अलर्ट आहे असे सांगण्यात आले होते. अशा प्रकारचा अलर्ट असण्याची शक्यता फारच कमी असते. भारतीय गुप्तचर विभागाकडून अलर्ट आलेला असल्यास तो गोवा पोलिसांना जाणे अनिवार्य असते. त्यामुळे हा प्रात्यक्षिकांचाच भाग असावा हे स्पष्ट झाले होते. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर देशाला समुद्रामार्गे धोका संभवू शकतो, हे पहिल्यांदाच स्पष्ट झाले होते. त्यामुळे अशा घटना भविष्यात घडल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवण्यात यावी, यासाठी सागर कवच प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली. एकाचवेळी जमिनीवर, किनाऱ्यांवर आणि समुद्रात ही प्रात्यक्षिके होतात. नकली अतिरेक्यांकडून नकली बॉम्बही ठेवले जातात. नियोजित जागी बॉम्ब ठेवण्याचे आव्हान काही जणांकडे असते तर त्यांना रोखण्याचे आणि बॉम्ब ठेवल्यास ते शोधून काढण्याचे आव्हान इतर पोलिसांवर असते. 

टॅग्स :goaगोवाTerror Attackदहशतवादी हल्ला