शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

घरदुरुस्तीसाठी आता सचिव तीन दिवसांत देणार परवाना!; सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:09 IST

फाईल बीडीओकडे जाणार नाही : मुख्यमंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : घर दुरुस्तीसाठी यापुढे पंचायत सचिवच तीन दिवसांत परवाना देतील. गट विकास अधिकाऱ्यांकडे फाईल जाणार नाही. पाच वर्षांची सलग घरपट्टी भरलेली असल्यास घरदुरुस्तीसाठी परवाना त्वरित मिळेल. सरकारकडून असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

पंचायत संचालकांनी यासंबंधीचे परिपत्रकही लगेच जारी केले आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पंचायत क्षेत्रात असलेली जुनी घरे दुरुस्तीसाठी काढताना परवान्यासाठी फाईल, व्हीडिओ तसेच अन्य यंत्रणांकडे पाठवावी लागत, त्यामुळे लोकांना त्रास व्हायचा. सरकारने हा त्रास सुद्धा दूर केला आहे. घरमालकाने गेल्या पाच वर्षांची घरपट्टी सलग भरलेली असल्यास तसेच इतर आवश्यक ते दस्तऐवज असल्यास घर दुरुस्तीसाठी लगेच परवाना दिला जाईल.

घरमालकांनी कायदेशीर कागदपत्रे, घराचा प्लॅन, फोटो आणि आर्किटेक्ट किंवा अभियंत्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्याचबरोबर गेडा'मध्ये तीन सहा एक पदे निर्माण केली असूनही पदे लवकरच भरली जाणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगिले.

परिपत्रकही जारी

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पंचायत खात्याच्या संचालक सिद्धी हळर्णकर यांनी लगेच परिपत्रक जारी केले. घर दुरुस्ती परवाना संदर्भातील १९९९ व २००२ च्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व दस्तऐवज, दुरुस्तीचा अंदाजित खर्च सादर करावा लागेल. आवश्यक ते शुल्क भरल्यानंतर तीन दिवसात पंचायत सचिव परवाना देतील. तीन दिवसांच्या आत सचिवाने परवाना न दिल्यास आपोआप परवाना दिल्याचे गृहीत धरून घरमालकाला दुरुस्तीकाम सुरू करता येणार आहे.

अडीचशेहून अधिक वाहनांचा लिलांव

बैठकीत अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात सरकारी मालकीची भंगारात पडलेली अडीचशेहून अधिक वाहने पर्वरी, मडगाव व म्हापसा येथे मेळावा भरवून लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ वर्षांपेक्षा कमी जुनी वाहने लोक खरेदी करू शकतात आणि त्यांचा पुनर्वापर करू शकतात. १५ वर्षांपेक्षा जास्त काळ झालेली वाहने खरेदी करणाऱ्याने ती स्क्रॅपमध्ये काढावी लागतील. कारण ती पुन्हा रस्त्यावर वापरता येणार नाहीत. १५ वर्षांपेक्षा कमी जुनी ३४ वाहने आहेत. रस्त्याच्या कडेला पार्क केलेली आणि वर्षानुवर्षे वापरात नसलेली कोणतीही सरकारी वाहने असल्यास ती राज्य सरकारच्या निदर्शनास आणण्याचे आवाहनही लोकांना करण्यात आले आहे.

महामार्गांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन्स येणार

गोव्यात महामार्गावर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी ईव्ही चार्जिंग स्टेशन आणि सार्वजनिक शौचालये उभारणार आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बॅटरी स्वॅपिंग स्टेशनही उभारणार आहे, त्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली. हद्दीवरही चार्जिंग स्टेशन, चेंजिंग रूम आणि शौचालयेही उभारली जातील. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत