शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील समुद्रकिनारे पावसाळ्यात अधिक धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 13:58 IST

पावसाळी पर्यटनाचे ढोल गोवा सरकारच्या काही यंत्रणा जोरात वाजवत असल्या तरी, प्रत्यक्षात पावसाळ्यात गोव्यातील समुद्रकिनारे अधिक धोकादायक बनलेले आहेत. याची कोणतीही कल्पना नसलेले देश-परदेशातील पर्यटक समुद्रात स्वत:ला झोकून देतात आणि जीव गमावून बसत आहेत.

पणजी : पावसाळी पर्यटनाचे ढोल गोवा सरकारच्या काही यंत्रणा जोरात वाजवत असल्या तरी, प्रत्यक्षात पावसाळ्यात गोव्यातील समुद्रकिनारे अधिक धोकादायक बनलेले आहेत. याची कोणतीही कल्पना नसलेले देश-परदेशातील पर्यटक समुद्रात स्वत:ला झोकून देतात आणि जीव गमावून बसत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत अशा प्रकारे सात पर्यटकांना जलसमाधी मिळाली आहे तर काहीजण बुडताना वाचले आहेत. गोव्यात पावसाळी पर्यटन अजून पूर्णपणे विकसित झालेले नाही. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य खुललेले असते. गोव्याचा पाऊस हा पर्यटकांना हवाहवासा वाटतो.  ढगफुटी झाल्यासारखा पाऊस गोव्यात पडत नाही. किंवा अखंडितपणेही पाऊस बरसत नाही.

पाऊस मध्येच गायब होतो व लख्ख ऊन पडतं. पर्यटकांना असे वातावरण आवडते. मात्र गोव्यातील समुद्र हा पावसात अधिक खवळलेला असतो. गोव्याला 105 किलोमीटर लांबीचा सागरकिनारा आहे, त्यापैकी 70 टक्के किनारपट्टी ही पावसाळ्य़ात पोहण्यासाठी पूर्णपणे धोकादायक बनलेली असते. काही भागात जीवरक्षकांनी लाल ङोंडे लावलेले आहेत. लाव ङोंडे लावलेल्या ठिकाणी पोहायला जायचे नसते, हे पर्यटक लक्षात घेत नाहीत.

काही ठिकाणी तर लाल बावटेही लावलेले नाहीत. शिवाय जीवरक्षक काही पूर्ण 105 किलोमीटरच्या किना-यावर उभे नसतात. ते ठराविक जागांवर असतात. दृष्टी संस्थेकडे किना-यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने दिलेली आहे. सुमारे एक हजार जीवरक्षकांना प्रशिक्षण देण्याचा संकल्प नुकताच गोवा पर्यटन विकास महामंडळाने सोडलेला आहे. मात्र सध्या गोव्यातील समुद्र पर्यटकांचा जीव घेऊ लागला आहे व सरकारी यंत्रणा त्याविरुद्ध मोठय़ा व प्रभावी उपाययोजना करण्यात कमी पडत आहेत. 

पर्यटन मंत्री बाबू आजगावकर तसेच पर्यटन महामंडळाचे चेअरमन निलेश काब्राल म्हणाले,की पावसाळ्य़ात एखाद्या ठिकाणी पोहायला जाऊ नका असे सांगितले तरी काहीवेळा पर्यटक ऐकत नाहीत. काहीवेळा रात्री तर काहीवेळा अगदी पहाटे पर्यटक पोहण्यासाठी समुद्रात उतरतात व बुडतात. सरकार पावसाळ्य़ात समुद्राकडे जाऊच नका असा नकारात्मक प्रचार करू शकत नाही पण पावसाळ्य़ात समुद्रात उतरण्यास पूर्ण बंदी लागू करता येईल काय याची शक्यता कायद्याच्या चौकटीत राहून सरकार सध्या पडताळून पाहत आहे.

गेल्या पंधरा दिवसांत सात पर्यटक गोव्यात बुडाले. त्यापैकी पाच पर्यटक हे महाराष्ट्रातील अकोला येथील आहेत. तामिळनाडू येथील पर्यटक सिकेरीच्या पट्टय़ात खडकावर बसलेला असताना सागराच्या लाटेने त्याला आत ओढून नेले. पावसाळ्य़ात समुद्राच्या एवढ्या जवळ बसणेही घातक आहे हे पर्यटकांना कुणी सांगितलेच नाही. बागा येथेही एक पर्यटक बुडाला.

टॅग्स :goaगोवा