शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

गोव्यातील समुद्रकिनारे पावसाळ्यात अधिक धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 13:58 IST

पावसाळी पर्यटनाचे ढोल गोवा सरकारच्या काही यंत्रणा जोरात वाजवत असल्या तरी, प्रत्यक्षात पावसाळ्यात गोव्यातील समुद्रकिनारे अधिक धोकादायक बनलेले आहेत. याची कोणतीही कल्पना नसलेले देश-परदेशातील पर्यटक समुद्रात स्वत:ला झोकून देतात आणि जीव गमावून बसत आहेत.

पणजी : पावसाळी पर्यटनाचे ढोल गोवा सरकारच्या काही यंत्रणा जोरात वाजवत असल्या तरी, प्रत्यक्षात पावसाळ्यात गोव्यातील समुद्रकिनारे अधिक धोकादायक बनलेले आहेत. याची कोणतीही कल्पना नसलेले देश-परदेशातील पर्यटक समुद्रात स्वत:ला झोकून देतात आणि जीव गमावून बसत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत अशा प्रकारे सात पर्यटकांना जलसमाधी मिळाली आहे तर काहीजण बुडताना वाचले आहेत. गोव्यात पावसाळी पर्यटन अजून पूर्णपणे विकसित झालेले नाही. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य खुललेले असते. गोव्याचा पाऊस हा पर्यटकांना हवाहवासा वाटतो.  ढगफुटी झाल्यासारखा पाऊस गोव्यात पडत नाही. किंवा अखंडितपणेही पाऊस बरसत नाही.

पाऊस मध्येच गायब होतो व लख्ख ऊन पडतं. पर्यटकांना असे वातावरण आवडते. मात्र गोव्यातील समुद्र हा पावसात अधिक खवळलेला असतो. गोव्याला 105 किलोमीटर लांबीचा सागरकिनारा आहे, त्यापैकी 70 टक्के किनारपट्टी ही पावसाळ्य़ात पोहण्यासाठी पूर्णपणे धोकादायक बनलेली असते. काही भागात जीवरक्षकांनी लाल ङोंडे लावलेले आहेत. लाव ङोंडे लावलेल्या ठिकाणी पोहायला जायचे नसते, हे पर्यटक लक्षात घेत नाहीत.

काही ठिकाणी तर लाल बावटेही लावलेले नाहीत. शिवाय जीवरक्षक काही पूर्ण 105 किलोमीटरच्या किना-यावर उभे नसतात. ते ठराविक जागांवर असतात. दृष्टी संस्थेकडे किना-यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने दिलेली आहे. सुमारे एक हजार जीवरक्षकांना प्रशिक्षण देण्याचा संकल्प नुकताच गोवा पर्यटन विकास महामंडळाने सोडलेला आहे. मात्र सध्या गोव्यातील समुद्र पर्यटकांचा जीव घेऊ लागला आहे व सरकारी यंत्रणा त्याविरुद्ध मोठय़ा व प्रभावी उपाययोजना करण्यात कमी पडत आहेत. 

पर्यटन मंत्री बाबू आजगावकर तसेच पर्यटन महामंडळाचे चेअरमन निलेश काब्राल म्हणाले,की पावसाळ्य़ात एखाद्या ठिकाणी पोहायला जाऊ नका असे सांगितले तरी काहीवेळा पर्यटक ऐकत नाहीत. काहीवेळा रात्री तर काहीवेळा अगदी पहाटे पर्यटक पोहण्यासाठी समुद्रात उतरतात व बुडतात. सरकार पावसाळ्य़ात समुद्राकडे जाऊच नका असा नकारात्मक प्रचार करू शकत नाही पण पावसाळ्य़ात समुद्रात उतरण्यास पूर्ण बंदी लागू करता येईल काय याची शक्यता कायद्याच्या चौकटीत राहून सरकार सध्या पडताळून पाहत आहे.

गेल्या पंधरा दिवसांत सात पर्यटक गोव्यात बुडाले. त्यापैकी पाच पर्यटक हे महाराष्ट्रातील अकोला येथील आहेत. तामिळनाडू येथील पर्यटक सिकेरीच्या पट्टय़ात खडकावर बसलेला असताना सागराच्या लाटेने त्याला आत ओढून नेले. पावसाळ्य़ात समुद्राच्या एवढ्या जवळ बसणेही घातक आहे हे पर्यटकांना कुणी सांगितलेच नाही. बागा येथेही एक पर्यटक बुडाला.

टॅग्स :goaगोवा