शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मोफत पाण्याचा गैरवापर, म्हणून योजनाच केली बंद; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:49 IST

आगशी व नावशी येथील जलप्रकल्पांचे उद्घाटन.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मोफत पाणी देण्याच्या योजनेचा लोकांनी गैरफायदा घेतला. काहींनी चार-चार मीटर घेतले. त्यामुळेच सरकारने मोफत पाणी योजना बंद केली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

'हर घर नल से जल' या योजनेअंतर्गत सांतआंद्रे मतदारसंघातील आगशी व नावशी येथील जलप्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या दोन्ही प्रकल्पांचा एकूण खर्च २१ कोटी रुपये आहे. ग्रामीण भागातील घरांना नळांद्वारे सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प हाती घेतले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने मध्यंतरी मोफत पाणी देण्याची योजना सुरू केली होती. मात्र, या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला. काहींनी तर चार-चार मीटर घेतले. त्यामुळेच सरकारने ही योजना बंद केली. लोकांनी पाण्याचा वापर सांभाळून करावा. गाडी धुण्यासाठी, गार्डनमध्ये पाण्याचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केली. राज्य सरकार 'हर घर नल से जल' यशस्वीपणे राबवली जात आहे. त्याच धर्तीवर शौचालय सुद्धा प्रत्येक घराला असावे, या उद्देशाने सरकार काम करीत आहे. 

जल, शौचालय, रस्ता, वीज यांसारख्या पायाभूत सुविधा सर्वांना मिळाव्यात हे ध्येय आहे. भारत देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होणार, तेव्हा म्हणजेच २०४७पर्यंत विकसित भारत करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले असून, त्या दिशेने सातत्याने काम करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्यासह मतदारसंघातील सरपंच, पंच सदस्या उपस्थित होते.

जनतेपर्यंत पाणी पोचण्यासाठी सरकार ४० टक्के आर्थिक नुकसान सोसते. पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सरकारला प्रति क्युबिक लिटर २० रुपये खर्च येतो. मात्र, सरकार प्रति क्युबिक लिटर मागे जनतेला केवळ ४ रुपये इतकाच शुल्क लागू करते.

टाक्यांची दुरुस्ती हवी

सांतआंद्रेतील पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती हाती घेतली जात आहे. पाण्याचे संवर्धन व्हावे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा आपण आभारी आहे, की मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले, असे आमदार वीरेश बोरकर यांनी नमूद केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत