शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

'संजीवनी'ला पुन्हा संजीवनी नक्की: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2024 10:44 IST

दयानंदनगर धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क उसगाव : संजीवनी सहकारी साखर कारखान्याला पुन्हा संजीवनी नक्की देण्यात येईल, त्यासाठी ऊस पीक वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. दयानंदनगर धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली.

कुळे येथील दूधसागर धबधबा वाहतूक करणाऱ्या भाडोत्री जीप वाहतुकीचे दर, तसेच खनिज मालवाहू टिप्पर ट्रकमालकांच्या समस्या यावर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही सावंत यांनी दिले. यावेळी आमदार गणेश गावकर, दक्षिण जि.पं. सदस्या सुवर्णा तेंडुलकर, सावर्डे मतदारसंघ भाजपा मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, धारबांदोडा पंचायतीचे सरपंच बालाजी ऊर्फ विनायक गावस, जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर उपस्थित होत्या. यावेळी संजीवनी साखर कारखान्याचे कामगार, खनिज ट्रकमालक आदी उपस्थित होते.

पर्यटक वाहतूक दरासंदर्भातही निर्णय होणार

दूधसागर धबधब्यावर पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या भाडोत्री जीप वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी २३ कोटी रुपये खर्च करून पक्का रस्ता करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे; परंतु सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्याने रस्ता काम स्थगित ठेवण्यात आले आहे. पर्यटक वाहतूक दरासंदर्भात निर्णय आचारसंहिता संपल्यावर घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत