शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

गोव्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा उद्यापासून गळीत हंगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 1:59 PM

गोव्यातील एकमेव सहकारी कारखाना : गत साली ४७,३८७ टन ऊस गाळप

पणजी : गोव्यात सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम मंगळवारपासून (14 नोव्हेंबर) सुरू होत आहे. या वर्षी गोव्यातील ५0 हजार टन आणि शेजारी कर्नाटकातील १ लाख टन मिळून दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याचे प्रशासक उमेशचंद्र जोशी यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.

गेल्या वर्षी ४७,३८७ टन ऊस गाळप झाले होते व त्यातून ३९,७२८ क्विंटल साखर उत्पादन झाले. ७ हजार टन स्थानिक ऊस आणि सुमारे ४0 हजार टन शेजारी राज्यातील ऊसाचे गाळप झाले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अलिकडेच कारखान्याचे आधुनिकीकरण लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते त्या पार्श्वभूमीवर कामेही सुरू झाली आहेत.

प्राप्त माहितीनुसार गत साली ऊस गाळपातून सुमारे ८.३८ टक्के इतका उतारा मिळाला आणि ३९,७२८ क्विंटल साखर उत्पादन झाले. यंदा रामनगर, हल्याळ, अळणावर, हेब्बाळ आदी भागांबरोबरच यावर्षी खानापूर येथूनही ऊस आयात करण्याचे ठरले आहे.

कोल्हापूरचे साखरतज्ज्ञ सल्लागार?सरकारने ऊस उत्पादकांना आधारभूत दर प्रती टन ५00 रुपयांनी वाढवून दिला आहे. कारखान्याकडून १२00 रुपये तर सरकारकडून १८00 रुपये असे एकूण ३ हजार रुपये प्रती टन उत्पादकांना आता मिळतील. यापूर्वी सरकारकडून १३00 रुपये आणि कारखान्याकडून १२00 रुपये मिळून अडीच हजार रुपये दिले जात असत. कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे त्यासाठी नवी यंत्रसामुग्री आणली जाणार आहे. कोल्हापूर येथील साखरतज्ज्ञ बी. एन. पाटील यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा विचार आहे. पाटील यांनी साखर क्षेत्रात केवळ भारतातच नव्हे तर केनियासारख्या देशातही काम केलेले आहे.

त्यांना या क्षेत्रात तब्बल ३४ वर्षांचा अनुभव आहे. कारखान्यातील यंत्रसामुग्री इतकी जुनी झाली आहे की त्याच्या देखभालीवरच वर्षाकाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च येतो, अशी माहितीही जोशी यांनी दिली. इथॅनॉल, बायोगॅसची निर्मिती करुन कारखाना नफ्यात आणता येईल, असे गेल्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी सूचविले आहे. कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २0१६-१७ च्या गळीत हंगामात राज्यात ४0,२३४ टन ऊस उत्पादन झाले आणि हा ऊस संजीवनी सहकारी साखर कारखान्याला पुरविण्यात आला. आधी अडीच हजार रुपये प्रति टन आधारभूत दर दिला जात होता त्यात आता ५00 रुपयांची भर पडली आहे.

शेजारी राज्यावरच अवलंबनसंजीवनी साखर कारखान्याची गरज गोव्यात उत्पादन होणा-या ऊसातून भागत नाही. त्यामुळे शेजारी कर्नाटक तसेच महाराष्ट्रातून ऊस मागवावा लागतो. गोव्यातील ऊस लागवड क्षेत्र गेल्या काही वर्षांच्या काळात स्थिर राहिलेले आहे. संजीवनी साखर कारखाना हा सहकार क्षेत्रातील एकमेव कारखाना आहे. मात्र या कारखान्याला पुरेसा ऊस मिळत नाही. ऊस उत्पादनवाढीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. नवीन जागा लागवडीखाली आणण्यासाठी प्रती हेक्टर १0 हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते. मजूर खर्चावर हेक्टरी ५0 टक्के किंवा १0 हजार रुपये जी रक्कम कमी असेल ती दिली जाते. गळीत हंगामाच्या उद्घाटनासाठी उद्या स्थानिक आमदार तथा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर तसेच सांगेचे आमदार प्रसाद गांवकर उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा