शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

वाळू उपसा नियमन, पश्चिम घाटातील ४० पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गांव वगळा

By किशोर कुबल | Updated: February 16, 2024 16:04 IST

मध्यंतरी याच प्रश्नावर केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे तज्ज्ञ पथक राज्याच्या दौऱ्यावर आले होते.

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्री भूपेंद्रसिंह यादव यांची भेट घेऊन राज्यातील अडलेला वाळू उपसा, पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित झालेले गाव तसेच २०११ च्या सीझेडएमपीत सुधारणा या मुद्द्यांवर चर्चा केली तसेच राखीव व्याघ्रक्षेत्राबाबतही सरकारची भूमिका मांडली.

राज्यात वाळू उपसा व्यवसाय अडलेला आहे. वाळू उपशाबाबतचे नियमन तसेच पश्चिम घाटात जी ९९ गावे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित झालेली आहेत, त्यातील ४० गाव वगळण्याच्या मागणीचाही पाठपुरावा करण्यात आला.

मध्यंतरी याच प्रश्नावर केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे तज्ज्ञ पथक राज्याच्या दौऱ्यावर आले होते. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गाव निश्चित करण्यासाठी तीन निकष होते. एक तर संबंधित गाव पश्चिम घाटाशी संलग्न असला पाहिजे, समुद्रसपाटीपासून विशिष्ट उंचीवर असावा आणि वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींची उपस्थिती असावी. राज्य सरकारची अशी भूमिका आहे की केंद्र सरकारला हवे असल्यास आणखी १० गावे ते जोडू शकतात, परंतु ही ४० गावे निकषात बसत नाहीत, त्यामुळे ती वगळायला हवीत.

एखादे गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून अधिसूचित झाल्यास, शेती आणि घरे बांधण्यास मनाई केली जाईल, असे नाही. लाल श्रेणीतील उद्योग आणि व्यावसायिक खाणी वगळता बहुतेक क्रियाकलापांना परवानगी आहे. दरम्यान, राखीव व्याघ्र क्षेत्राबाबत हायकोर्टाने जो निवाडा दिला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आव्हान दिले असल्याची कल्पना यादव यांना देण्यात आली. 

टॅग्स :goaगोवा