शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वाळू उपसा नियमन, पश्चिम घाटातील ४० पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गांव वगळा

By किशोर कुबल | Updated: February 16, 2024 16:04 IST

मध्यंतरी याच प्रश्नावर केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे तज्ज्ञ पथक राज्याच्या दौऱ्यावर आले होते.

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्री भूपेंद्रसिंह यादव यांची भेट घेऊन राज्यातील अडलेला वाळू उपसा, पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित झालेले गाव तसेच २०११ च्या सीझेडएमपीत सुधारणा या मुद्द्यांवर चर्चा केली तसेच राखीव व्याघ्रक्षेत्राबाबतही सरकारची भूमिका मांडली.

राज्यात वाळू उपसा व्यवसाय अडलेला आहे. वाळू उपशाबाबतचे नियमन तसेच पश्चिम घाटात जी ९९ गावे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित झालेली आहेत, त्यातील ४० गाव वगळण्याच्या मागणीचाही पाठपुरावा करण्यात आला.

मध्यंतरी याच प्रश्नावर केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे तज्ज्ञ पथक राज्याच्या दौऱ्यावर आले होते. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गाव निश्चित करण्यासाठी तीन निकष होते. एक तर संबंधित गाव पश्चिम घाटाशी संलग्न असला पाहिजे, समुद्रसपाटीपासून विशिष्ट उंचीवर असावा आणि वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींची उपस्थिती असावी. राज्य सरकारची अशी भूमिका आहे की केंद्र सरकारला हवे असल्यास आणखी १० गावे ते जोडू शकतात, परंतु ही ४० गावे निकषात बसत नाहीत, त्यामुळे ती वगळायला हवीत.

एखादे गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून अधिसूचित झाल्यास, शेती आणि घरे बांधण्यास मनाई केली जाईल, असे नाही. लाल श्रेणीतील उद्योग आणि व्यावसायिक खाणी वगळता बहुतेक क्रियाकलापांना परवानगी आहे. दरम्यान, राखीव व्याघ्र क्षेत्राबाबत हायकोर्टाने जो निवाडा दिला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आव्हान दिले असल्याची कल्पना यादव यांना देण्यात आली. 

टॅग्स :goaगोवा