शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपसा; पहिल्या टप्प्यात ९0 व्यावसायिकांना परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2015 01:44 IST

पणजी : वाळू उपशासाठी ९0 व्यावसायिकांना पहिल्या टप्प्यात परवाने देण्यात येणार आहेत. येत्या शुक्रवारपर्यंत त्यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही

पणजी : वाळू उपशासाठी ९0 व्यावसायिकांना पहिल्या टप्प्यात परवाने देण्यात येणार आहेत. येत्या शुक्रवारपर्यंत त्यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही निश्चित होतील. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याबाहेरून रेती, खडी, चिरे आदी साहित्य घेऊन येणाऱ्या वाहनांना दर खेपेला ४00 रुपये टोल लागू करण्याचा निर्णयही झाला आहे. दोन्ही जिल्हाधिकारी, खाण खात्याचे अधिकारी तसेच गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पार्सेकर यांनी येत्या नोव्हेंबरपासून राज्यात कायदेशीरपणे वाळू व्यवसाय सुरू होईल, असे सांगितले. २0११ साली राष्ट्रीय हरित लवादाने वाळू उपशावर बंदी घातली, तेव्हा ९0 अर्ज सरकारकडे प्रलंबित होते. हे अर्ज पहिल्या टप्प्यात निकालात काढले जातील. एकूण ५९७ अर्ज व्यावसायिकांचे अर्ज आले आहेत. वरील ९0 अर्जांवर लवादाच्या बंदीमुळे गेल्या तीन वर्षांत निर्णय होऊ शकला नव्हता. आता मार्गदर्शक तत्त्वे घालूनच परवाने दिले जाणार आहेत. नवरा, बायको आणि मुलगा किंवा मुलगी अशा तीन सदस्यांच्या कुटुंबाला या व्यवसायासाठी एकापेक्षा अधिक होड्या वापरता येणार नाहीत. बंदर कप्तान खात्याकडे नोंदणी अनिवार्य असेल. याशिवाय अन्य मार्गदर्शक तत्त्वेही लागू केली जाणार आहे. या आधीच्या बैठकीत व्यवसायावर काही निर्बंधही घालण्यात आलेले आहेत. त्यानुसार सायंकाळी ६ वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत वाळू काढण्यास मनाई आहे. मान्सून काळात १ जून ते ३0 सप्टेंबर या कालावधीत वाळू उपशास बंदी आहे. वाळू काढण्यासाठी कोणत्याही यंत्रसामग्रीचा वापर करता येणार नाही. मोटर बसविलेल्या होड्यांचा वापर करता येईल; परंतु वाळू पारंपरिक पद्धतीनेच काढावी लागेल. सध्या पर्यावरणीय परवाने नसतानाच बेकायदा वाळू उपसा चालू होता. सरकारचा महसूलही त्यामुळे बुडत होता. आता ईसी तसेच इतर परवाने प्राप्त झाल्यानंतर या व्यवसायाला कायदेशीर स्वरूप येईल आणि रॉयल्टीच्या माध्यमातून सरकारला महसूलही मिळणार आहे. दरम्यान, राज्याबाहेरून रेती, चिरे, खडी आदी बांधकाम साहित्य आणणाऱ्या वाहनांना केवळ २00 रुपये प्रवेश कर होता. आता प्रत्येक ट्रिपला ४00 रुपये टोल भरावा लागेल. (प्रतिनिधी)