शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचे वेतन, भत्ते बंद करा; गोव्यात काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 20:09 IST

कोविड महामारी, आर्थिक स्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप

पणजी : कोविड महामारीची स्थिती हाताळण्यात तसेच राज्याचा आर्थिक डोलारा सांभाळण्यातआलेले अपयश लपविण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप करुन प्रदेश कॉग्रेसचे माध्यम विभागाचे निमंत्रक ट्रोजन डिमेलो यांनी सर्व आमदारांचे वेतन व भत्ते बंद करण्याची मागणी केली आहे.पत्रकार परिषदेत डिमेलो म्हणाले की, सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांना कोणतेच काम राहिलेले नाही त्यामुळे त्यांचे वेतन व त्यांना मिळणारे अन्य भत्ते बंद केले जावेत. डिमेलो म्हणाले की, ‘ या सरकारने विधानसभेचे मान्सून अधिवेशन केवळ एक दिवसाचे केले. वास्तविक या अधिवेशनात सरकारने कोविड महामारी हाताळण्याच्या बाबतीत कोणत्या उपययोजना केलेल्या आहेत यावर विस्तृत चर्चा होणे अपेक्षित होते. सरकारच्या चुकांमुळे राज्यातील जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.’डिमेलो म्हणाले की, ‘ राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत जाणून घेण्याच्या अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. सरकारने कोविड महामारी हाताळण्यासाठीच्या उपाययोजना आणि राज्याची आर्थिक स्थिती या दोन्ही गोष्टींवर श्वेतपत्रिका काढायला हवी. ते म्णाले की, ‘ सध्या सरकार मुळीच कार्यरत नाही. त्यामुळे आमदारांना कोणतीही भूमिका राहिलेली नाही. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकार उत्तर देत नाही. ही लोकशाही का?, असा सवाल ट्रोजन यांनी केला.’डिमेलो म्हणाले की,‘आरोग्यमंत्र्यांनी अलीकडेच कोविड रुग्णांसाठी खाटा पुरेशा नसल्याचे जे विधान केले त्यावरुन सरकारचे ढेपाळलेले नियोजन उघड होते. लॉकडाऊन करुन नेमके केले काय?असा प्रश्न उपस्थित होतो. सुरवातीलाच ग्रीन झोनचा डंका सरकारने पिटला. लोकांनी घाबरुन जाऊ नये असा खोटा आभास निर्माण केला. नंतर गोवा एकूण लोकसंख्येच्या १ टक्का लोक कोविडबाधित झालेले देशातील पहिले राज्य कसे ठरले? अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यासाठी आधी हालचाली का केल्या नाहीत? आता दर दिवशी १ हजार नवे बाधित सापडत आहेत. पाच दिवसात ५ हजार बाधित गृहित धरले तर सरकारकडे कोविडसाठी किती खाटांची व्यवस्था आहे? मडगांवचे जिल्हा इस्पितळ कोविडसाठी घेण्यात आले असले तरी पुढील दहा दिवस ते सुरु होण्याची शक्यता नाही. २00 व्हेंटिलेटर्स मागविले आहेत ते कुठे बसविणार? घरी विलगीकरणात राहणारे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात की नाही याची खातरजमा केली जाते का? त्यांना सरकारकडून योग्य सुविधा दिल्या जातात का? सर्व खाजगी इस्पितळांना कोविडसाठी खाटा उपलब्ध करणे सक्तीचे का नाही? खाजगी इस्पितळांमध्ये आकारल्या जाणाºया फी वर नियंत्रण का नाही? आदी सवाल लोक करीत आहेत.