शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गोव्याला सुरक्षा कवच

By admin | Updated: December 29, 2015 01:46 IST

पणजी : नववर्षाचा आनंद घेण्यासाठी राज्यात पर्यटकांचा ओघ सुरू झाल्यामुळे प्रशासनातर्फे सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत

पणजी : नववर्षाचा आनंद घेण्यासाठी राज्यात पर्यटकांचा ओघ सुरू झाल्यामुळे प्रशासनातर्फे सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पर्यटकांची झुंबड असलेल्या ठिकाणी सशस्त्र पोलिसांसह अतिरेकीविरोधी विभाग व राखीव पोलिसांनाही तैनात करण्यात आले आहे. वर्षसमाप्ती व नववर्षाच्या जल्लोषाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, यासाठी प्रशासन झटत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. ही शक्यता गृहीत धरूनच सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. रेंगनाथन यांनी सांगितले. आवश्यक त्या ठिकाणी टेहळणी मनोरे उभारण्यात आले असून त्यावर सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. १०० किनारी पोलीस, ३५ पर्यटन विभागाचे पोलीस, ७० दहशतवादविरोधी विभागाचे पोलीस, आयआरबीचे जवान आणि राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय पोलीस स्थानकांना महत्त्वाच्या ठिकाणी गस्त घालण्याचे काम देण्यात आले आहे. गोव्यात ज्या धार्मिकस्थळांत पर्यटकांचा ओढा असतो, त्या स्थळांकडे गस्ती घालण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने चर्च व मंदिरांचा समावेश आहे. किनारी भागात आयआरबीचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पर्यटकांची पसंती असणारे व नेहमी गजबजलेले किनारे असलेले कळंगुट, हणजूण, कोलवा व पाळोळे या ठिकाणी सशस्त्र पोलीस ठेवण्यात आले आहेत. बॉम्ब डिफ्यूज स्कॉडही सतर्क करण्यात आले आहे, अशी माहिती रेंगनाथन यांनी दिली. (प्रतिनिधी)