शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आरटीआय दस्तऐवजांसाठी महसूल खात्याकडून भरमसाट शुल्क आकारणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 21:51 IST

हायकोर्टात जनहित याचिकेव्दारे आव्हान 

पणजी : गोव्याच्या महसूल खात्याने आरटीआय दस्तऐवजासाठी प्रत्येक पानामागे ५0 रुपये शुल्क आकारणी सुरु केली असून ती अन्यायकारक व घटनाबाह्य असल्याचा दावा करुन एक नागरिक ट्रोजन डिमेलो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठात जनहित याचिका सादर केली आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना ट्रोजन यांचे वकील अ‍ॅड. रोहित ब्रास डिसा म्हणाले की, आरटीआय नियमानुसार प्रती पान केवळ २ रुपये शुल्क आकारायला हवे परंतु महसूल खात्याने गेल्या मार्चमध्ये स्वतंत्र आदेश काढून हे शुल्क ५0 रुपये प्रती पान केले आहे. आपल्या अशिलाने आरटीआय अंतर्गत माहिती मागितली असता ७५ पानी दस्तऐवजासाठी ३,७५0 रुपये भरावे लागले. हे घटनाबाह्य आहे.’ लोकांनी माहिती मागू नये, भ्रष्टाचार बाहेर येऊ नये यासाठी ही शुल्कवाढ करण्यात आल्याचा आरोप डिसा यांनी केला. आरटीआय कायद्यांतर्गत नियम निश्चित केलेले आहेत त्यानुसार प्रत्येक पानामागे २ रुपयेच आकारता येतील, असे ते म्हणाले.  

भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठीच अधिकाधिक  लोक आरटीआयचा वापर करतात परंतु महसूल खात्याने शुल्क वाढवून लोकांना नाउमेद केले आहे. दस्तऐवजासाठी कागद उच्च प्रतीचा वापरला जातो, अशातलाही भाग नसल्याचे डिसा म्हणाले. 

याचिकादार ट्रोजन यांनी काँग्रेसने हा विषय घ्यावा आणि आमदारांनी येत्या विधानसभेत सरकारला या शुल्कवाढीबाबत जाब विचारावा, अशी मागणी केली आहे. सरकारला कारभारात पारदर्शकता ठेवायची नाही त्यामुळेच अशा एकेक क्लुप्त्या काढल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताgoaगोवाCourtन्यायालय