शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

आरटीआयशी प्रशासनाने पुकारला असहकार

By admin | Updated: September 17, 2014 01:27 IST

ढिम्म नोकरशाही : मुख्य माहिती आयुक्तांना कटू अनुभव

सद्गुरू पाटील-पणजी : राज्य सरकारच्या विविध खात्यांनी मोठ्या प्रमाणात आरटीआय अर्जदारांना माहिती देण्याबाबत टाळाटाळच चालवली आहे. माहिती हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत राज्य प्रशासनाने एक प्रकारे असहकारच पुकारला आहे. ढिम्म नोकरशाहीचे मुख्य माहिती आयुक्त लीना मेहेंदळे यांना अनेक कटू अनुभव येत असून सरकारनेही एकप्रकारे राज्य माहिती आयोगाची सर्व बाजूंनी नाकाबंदीच केल्यासारखी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. या प्रतिनिधीने मेहेंदळे यांची मंगळवारी भेट घेतली. मेहेंदळे यांच्या नियुक्तीला एक वर्ष झाले. त्या येत्या जानेवारीमध्ये वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करत आहेत. त्या वेळी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. नव्याने पद भरायचे असेल, तर आताच प्रक्रिया सुरू करावी लागेल; पण सरकारने प्रक्रिया सुरू केलेली नाही. गेले वर्षभर मेहेंदळे यांचे कार्यालय अत्यंत कमी मनुष्यबळाच्या आधारे कसेबसे चालत आहे. कौशल्य असलेला कर्मचारीवर्ग नाही. अनेकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली; पण काही फायदा झाला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. अतिशय कमी जागेत मेहेंदळे कसेबसे आयोगाचे काम करत आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात आयोगाला दुसरीकडे जागा देण्याचा आदेश जारी झाला; पण अजून ती जागा हातात आलेली नाही. आता ती पुढील वर्षीच प्राप्त होईल, याची कल्पना मेहेंदळे यांनाही आली आहे. (पान १ वरून) आरटीआयखाली माहिती देणे कसे टाळावे याचाच विचार अनेक अधिकारी करतात. बेकायदा बांधकामबाबत आपण केलेल्या तक्रारीबाबत काय कारवाई झाली, अशी विचारणा जर अर्जदारांनी केली, तर आपल्याकडे त्याबाबतची माहिती नाही, एवढेच सरकारी अधिकारी सांगतात. प्रत्यक्षात कारवाईही केली जात नाही व अर्जदाराला नीट उत्तरही दिले जात नाही. आपण आदेश देऊन व मग हायकोर्टाने आदेश देऊनदेखील एका पंचायतीच्या कर्मचाऱ्याने अर्जदारास माहिती दिली नाही. एका पालिकेच्या अधिकाऱ्यास आपण अर्जदाराला नुकसान भरपाई दे, असा आदेश दिला, तरी काही महिने त्या आदेशाचे पालन झाले नाही. मेहेंदळे म्हणाल्या की नोकरशाही एवढी ढिम्म आहे की, आरटीआय कायद्याचे औषध त्यासाठी खूपच कमी ठरत आहे. एका अर्जदाराने गोवा माहिती हक्क कायद्याखाली आपल्याला माहिती द्या, असे अर्जात म्हटले होते. त्यावर सरकारी अधिकाऱ्याने गोवा माहिती हक्क कायदा अस्तित्वात नाही, एवढेच उत्तर दिले. केंद्र सरकारचा २००५ सालचा माहिती हक्क कायदा अस्तित्वात आहे व त्यानुसार अर्जदारास माहिती द्यायला हवी, याकडे संबंधित अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. म्हणजे प्रचंड अनास्था व माहिती द्यायचीच नाही, अशी प्रवृत्ती दिसत आहे. यामुळे माहिती हक्क कायदा गोव्यात अमलात आणण्यामागील हेतू नष्ट होत आहे. प्रत्येकवेळी फाईल मिसिंग, आमच्याकडे कागदपत्रे नाहीत, आमच्याकडे नोंदी नाहीत, अशा प्रकारची उत्तरे अधिकारी देत आहेत. माहिती हक्क कायद्यात फक्त संबंधित अधिकाऱ्याला दंड ठोठविण्याची तरतूद आहे. संबंधित खाते प्रमुखाला व पहिल्या अपिलेट अथॉरिटीलाही दंड ठोठविण्याची तरतूद असायला हवी. आरटीआयबाबत अनेक खाते प्रमुख बेफिकीर आहेत.