शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

'विकसित भारत २०४७' चा नीती आयोगाकडून 'रोड मॅप'; चिंतन शिबिरात मार्गदर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 11:50 IST

आरोग्य, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधांवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मंत्र्यांच्या चिंतन शिबिरात 'विकसित भारत २०४७'चे ध्येय साध्य करण्यासाठी गोव्याची भूमिका काय असावी यावर नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी आपले विचार मांडले. सुप्रशासनाच्या माध्यमातून मैलाचा दगड कसा गाठता येईल, याबाबत त्यांनी 'रोड मॅप' ही घालून दिला.

बाणावली येथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचा समारोप काल झाला. आरोग्य, ग्रामीण विकास, पंचायती राज, वित्त, पायाभूत सुविधा, शहर विकास, पर्यटन, भू महसूल सार्वजनिक बांधकाम, जलस्रोत, उद्योगांसाठी इज ऑफ डुइंग बिझनेस, कृषी, वीज, ई-प्रशासन, आदी गोष्टींमध्ये आयटीच्या माध्यमातून सुप्रशासन कसे आणता येईल यावर दोन दिवस व्यापक चर्चा झाली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत अध्यक्षस्थानी होते. सर्व मंत्री तसेच मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल व प्रशासनात सचिव असलेले आयएएस अधिकारी शिबिरात सहभागी झाले होते. गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त विभाग) जे. पी. गुप्ता, हरयाणाच्या वित्त सचिव सोफिया दहिया, चंदीगढचे वाहतूक संचालक प्रद्युम्न सिंह, एआयपीएफचे प्राध्यापक प्रताप जिना, केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास आर्थिक सल्लागार कल्याणी मिश्रा, तेलंगणाचे उद्योग संयुक्त संचालक जे. डी. सुरेश, दिल्ली महापालिकेचे कार्यकारी अभियंता अकील अहमद, नेशन फर्स्ट पॉलिसी रीसर्चचे ओंकार साठे, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष दौलत हवालदार, भारतीय कृषी अनुसंधान केंद्राचे संचालक प्रवीण कुमार यांची या शिबिराला खास उपस्थिती होती.

या तज्ज्ञांकडे संवाद साधण्याची संधी मंत्री तसेच प्रशासनातील आयएएस अधिकाऱ्यांना मिळाली. पायाभूत सुविधा, मानव संसाधन विकसित करण्यावर दोन दिवस विचारमंथन झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्री, अधिकारी यांनी अर्थसंकल्प समजून घेण्याच्या महत्त्वावर भर दिला. महसूल निर्मिती तसेच इतर गोष्टींसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. मंत्री आणि महामंडळाच्या अध्यक्षांच्या देखरेखीची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. खातेप्रमुखांनी परिश्रमपूर्वक पर्यवेक्षण करून महसूल गळती रोखावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींची अंमलबजावणी कशी करायची याचे सादरीकरण करण्यात आले. जेणेकरून संबंधित खात्यांच्या बाबतीत अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची राज्यात अंमलबजावणी होईल. तसेच सर्वसमावेशक आरोग्य डेटाबेस तयार करणे आवश्यक असून, टेलिमेडिसिन सुविधाही सुरू करणे गरजेचे आहे, असे नमूद करण्यात आले.

लोकांची गैरसोय टाळा

नागरिक केंद्रित सेवांसाठी प्रक्रिया सुलभ करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त्त केली आहे. ऑनलाइन सुविधा गतिमान कराव्यात. ऑनलाइनद्वारे २४ तासांच्या आत लोकांना प्रमाणपत्रे, दाखले मिळायला हवेत. सामान्य लोकांना दिलासा मिळायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. जन्म, मृत्यू आणि विवाहाच्या नोंदी आणि वाहन परवाना प्रक्रिया सुलभ करणे, बांधकाम परवाने रखडत ठेवले जाऊ नयेत, असे निर्देश दिले.

गोवा सरकार प्रशासनासाठी ज्या काही गोष्टींचा अवलंब करावा लागेल तो प्राधान्यक्रमे करणार आहे. 'विकसित भारत २०४७'चे ध्येय गाठण्यासाठी तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नीती आयोगाने घालून दिलेल्या 'रोड मॅप'चा अवलंब करू. -डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत