शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

राजीनामे देणाऱ्यांना सहा वर्षे निवडणूक बंदी असावी : मगोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 13:04 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत मगोपचे तीन उमेदवार निवडून आले. त्यापैकी दोघे मंत्रिमंडळात आहेत. काँग्रेसचे दोन आमदार राजीनामे देऊन नुकतेच भाजपमध्ये गेले आहेत. निवडून येऊन केवळ दीड वर्ष होताच दोघा आमदारांनी आमदारकी सोडली.

पणजी : कोणत्याही पक्षाचे आमदार असोत पण विधानसभेचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण न करता मध्येच राजीनामा देणाऱ्या आमदारांना पुढील सहा वर्षे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी बंदी असायला हवी. यासाठी संबंधित कायद्यात दुरुस्ती केली जावी, असा आग्रह मगो पक्ष धरणार असल्याचे या पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी बुधवारी येथे जाहीर केले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मगोपचे तीन उमेदवार निवडून आले. त्यापैकी दोघे मंत्रिमंडळात आहेत. काँग्रेसचे दोन आमदार राजीनामे देऊन नुकतेच भाजपमध्ये गेले आहेत. निवडून येऊन केवळ दीड वर्ष होताच दोघा आमदारांनी आमदारकी सोडली. या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर बोलताना ढवळीकर म्हणाले, की एकेकाळी आमदार मगो पक्ष सोडून जात होते व त्यामुळे मगोपला फटका बसला होता. आता काँग्रेसचे आमदार जात आहेत पण मगो, काँग्रेससारखाच भाजपलाही फटका बसण्याचा धोका आहे व त्यामुळेच पिपल्स रिप्रजेन्टेशन अॅक्टमध्ये दुरुस्ती होण्याची गरज आहे. आमदारकी मध्येच सोडून देऊन पुन्हा पोटनिवडणुका लादल्या जातात. जनतेची थट्टा करत संबंधित माजी आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे जातात. लोकशाहीचे हे धिंडवडे बंद व्हायला हवेत व यासाठीच मध्येच राजीनामा देणाऱ्या आमदाराने सहा वर्षे विधानसभा निवडणूक लढवू नये अशी तरतुद कायद्यात करायला हवी. सहा वर्षानंतर मग निवडणूक लढवू द्या. पोटनिवडणुका स्वत:च्या स्वार्थासाठी जे जनतेवर लादतात, त्यांच्याकडून निवडणुकीचा खर्च वसुल करून घेतला जावा.

ढवळीकर म्हणाले, की जनेतेने प्रत्येक आमदाराला पाच वर्षासाठी निवडून दिलेले असते. लोकांच्या आमदाराकडून अपेक्षा असतात. पाच वर्षात त्याने विकास कामे वगैरे करून त्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात. मध्येच जर आमदारकी सोडून आमदार जाऊ लागले व पुन्हा निवडणुकीला उभे राहू लागले तर मग संसदीय लोकशाहीला अर्थ राहणार नाही. शिवाय सगळेच राजकीय पक्ष कमकुवत होऊन जातील. राजकीय पक्षांचा व जनतेचाही विश्वासघात थांबावा म्हणून मगो पक्ष कायद्यात दुरुस्तीसाठी उच्च न्यायालयात जाण्याचाही विचार करत आहे. काही ज्येष्ठ वकिलांचे सल्ले घेण्याचे काम सध्या मगोपने सुरू केले आहे.

ढवळीकर म्हणाले, की गोवा प्रशासनावर मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळेच ज्येष्ठ मंत्र्याकडे प्रशासनाची तात्पुरती धुरा सोपविली जावी. खनिज खाणी सुरू होत नाहीत, प्रशासन ठप्प होत आहे. स्थिती अशीच कायम राहिली  तर मगो पक्षावर जनतेच्या हितासाठी पुढील महिन्याभरात स्वतंत्रपणो निर्णय घेण्याची पाळी येईल. केंद्रीय खाण कायदा अजून दुरुस्त झालेला नाही, अध्यादेशही येत नाही. येत्या दोन महिन्यांत निदान काही खनिज खाणी तरी सुरू कराव्यात.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण