शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

देशाच्या विकासासाठी संशोधन महत्त्वाचं- डॉ. विठ्ठल तिळवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 13:54 IST

कुठल्याही देशाच्या विकासाचा कणा म्हणजे संशोधन. जागतिक स्तरावर प्रगत असलेल्या जपान, अमेरिका, चीनसारख्या देशांच्या तुलनेत संशोधनाच्या क्षेत्रात आपला देश बराच मागे राहिला.

म्हापसा : कुठल्याही देशाच्या विकासाचा कणा म्हणजे संशोधन. जागतिक स्तरावर प्रगत असलेल्या जपान, अमेरिका, चीनसारख्या देशांच्या तुलनेत संशोधनाच्या क्षेत्रात आपला देश बराच मागे राहिला. देशाची प्रगती व्हायची असल्यास संशोधन महत्त्वाचे असल्याने देशाने संशोधनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन नामवंत खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवे यांनी केले.मूळ भारतीय पण सध्या अमेरिकेतील अ‍ॅरिझोन राज्य विद्यापीठात कार्यरत असलेले खगोल शास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवे सध्या गोव्यात आहेत. म्हापसा-आसगाव येथील ज्ञानप्रसारक मंडळात सायन्स एक्स्पो २०१८ चे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहऴ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.भारतात संशोधनाच्या क्षेत्रात बराच अभाव असल्याचे दिसून आले आहे. संशोधनाच्या क्षेत्रात मागील १० वर्षे वगळता आपल्या देशाने इतर देशांनी केलेल्या प्रगतीवर अभ्यास करून नक्कल करण्यावर वेळ घालवला. त्यामुळे त्या देशांच्या तुलनेत आपला देश विकासाच्या तुलनेत बराच मागे राहिलेला आहे. याला कारण म्हणजे संशोधनावर उपलब्ध करून देण्यात आलेले आर्थिक पाठबळ. संशोधनासाठी योग्य प्रमाणावर आर्थिक पाठबळ उपलब्ध केल्यास इतर देशापेक्षा आपलाही देश मागे राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.एवढी वर्षे भारताने फक्त सैद्धांतिक संशोधनावर भर दिला. सैद्धांतिक संशोधनावर भर दिल्याने एकूण प्रगतीवर त्याचा परिणाम होत असतो. विकास कमी प्रमाणावर होत असतो. त्यामुळे सैद्धांतिक संशोधना सोबत व्यावहारिक संशोधनावर भर दिला असता तर त्याचा फायदा देशाला झाला असता असे डॉ. तिळवे म्हणाले. भारताच्या तुलनेत अमेरिकेतील शास्त्रज्ञांना जास्त मोकळीक दिली जाते. वातावरणाची निर्मिती केली जाते. त्याचा फायदा तेथील शास्त्रज्ञांना संशोधन करताना होत असतो. मोकळीक मिळाल्याने उत्सुकता वाढते. उस्तुकता वाढल्याने शास्त्रज्ञांच्या अभ्यासूवृत्तीत वाढ होते व ते एकूण संशोधनावर त्याचे परिणाम होऊन त्यातून चांगले शास्त्रज्ञ निर्माण होत असतात, असेही ते यावेळी म्हणाले.भारतातील शैक्षणिक पद्धत तशी वाईट नसली तरी भारताने बरीच वर्षे पारतंत्र्यात काढल्याने पालकांची मानसिकता अजुनही पारतंत्र्यात असल्या सारखी आहे. सुरक्षेच्या अभावी पालक आपल्या मुलांना स्वातंत्र देण्यास घाबरत असतात. पालकांनी मुलांना योग्य प्रमाणावर स्वातंत्र उपलब्ध करुन दिल्यास त्याचा बराच फायदा देशाच्या एकूण विकासावर होऊ शकतो अशीही माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.अमेरिकेसारख्या विकसित देशात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहे. स्पर्धेसाठी तशी वातावरण निर्मिती सुद्धा करण्यात आलेली आहे. असलेल्या या स्पर्धेतून त्यावर मात करीत मार्ग काढण्याचा प्रयत्न होत असतो व याचा फायदा एकूण प्रगतीवर होत असतो. गोव्यात असलेल्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेसारख्या आणखीन संस्थांची देशाला गरज असून सरकारने त्यावर अवश्य विचार करावा अशीही मागणी डॉ. विठ्ठल तिळवे यांनी यावेळी बोलताना केली.दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायन्स एक्स्पो २०१८ चे डॉ. तिळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत प्रा. डॉ. डी. बी. आरोलकर, उपप्राचार्य रिता दुकळे, विज्ञान विभागाच्या संयोजन पूजा बिडीये उपस्थित होत्या. डॉ. डी. बी. आरोलकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

टॅग्स :goaगोवा