शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

खाणप्रश्नी निती आयोग अहवाल देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 20:55 IST

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण बेकायदा ठरवून ते रद्द केल्यानंतर खनिज खाणी बंद झाल्या.

पणजी : गोव्याचा खनिज खाणप्रश्न आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम याचा अभ्यास करून निती आयोग आपला अहवाल देणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी निती आयोगाच्या बैठकीत तशी सूचना केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण बेकायदा ठरवून ते रद्द केल्यानंतर खनिज खाणी बंद झाल्या. विविध कायदेशीर बाबींची गुंतागुंत असल्याने सरकारला अजुनही खाण व्यवसाय सुरू करण्यात यश आलेले नाही. निती आयोगाच्या बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले. मुख्यमंत्री सावंतही त्या बैठकीत सहभागी झाले. गोव्यातील खनिज खाणी बंद झाल्याने अर्थव्यवस्थेवर जो परिणाम झाला त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे व ते काम आयोगाने कराव, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. खनिज खाण प्रश्नावर तोडगा काढण्याच्यादृष्टीने पंतप्रधान सकारात्मक आहेत. त्यांचे विषयावर लक्ष आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

झाडे लावण्याचा सल्ला दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व आमदारांना पत्रे लिहिली असून वन महोत्सवात सहभागी व्हा आणि अधिकाधिक झाडे लावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी या पत्रतून केली आहे. येत्या पावसाळ्य़ात आपण सगळे एकत्र येऊया व अधिकाधिक झाडे लावूया. समाजाच्या विविध घटकांच्या सहभागाने विविध ठिकाणी झाडे लावली जावीत. मी वन खात्याला जुलै ते सप्टेंबरच्या कालावधीत वनमहोत्सव साजरा करण्यासाठी सखोल अशी योजना तयार करण्यास सांगितले आहे. झाडे लावण्यासाठी जागा निवडण्याच्या हेतूने प्रत्येक आमदाराने वन खात्याला मार्गदर्शन करावे. उद्याने, बाग-बगिचे, हायस्कुल, महाविद्याले आदी ठिकाणी झाडे लावता येतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. लोकांच्या निवडीनुसार लोकांना व संस्थांना वन खाते रोपटी उपलब्ध करून देईल. या उपक्रमामुळे गोव्याचे हरित क्षेत्र अबाधित राहिल. आमदारांनी अधिक माहितीसाठी मुख्य वनपाल सुभाष चंद्रा यांच्याशी संपर्क साधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.