शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

खाणप्रश्नी निती आयोग अहवाल देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 20:55 IST

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण बेकायदा ठरवून ते रद्द केल्यानंतर खनिज खाणी बंद झाल्या.

पणजी : गोव्याचा खनिज खाणप्रश्न आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम याचा अभ्यास करून निती आयोग आपला अहवाल देणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी निती आयोगाच्या बैठकीत तशी सूचना केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण बेकायदा ठरवून ते रद्द केल्यानंतर खनिज खाणी बंद झाल्या. विविध कायदेशीर बाबींची गुंतागुंत असल्याने सरकारला अजुनही खाण व्यवसाय सुरू करण्यात यश आलेले नाही. निती आयोगाच्या बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले. मुख्यमंत्री सावंतही त्या बैठकीत सहभागी झाले. गोव्यातील खनिज खाणी बंद झाल्याने अर्थव्यवस्थेवर जो परिणाम झाला त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे व ते काम आयोगाने कराव, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. खनिज खाण प्रश्नावर तोडगा काढण्याच्यादृष्टीने पंतप्रधान सकारात्मक आहेत. त्यांचे विषयावर लक्ष आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

झाडे लावण्याचा सल्ला दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व आमदारांना पत्रे लिहिली असून वन महोत्सवात सहभागी व्हा आणि अधिकाधिक झाडे लावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी या पत्रतून केली आहे. येत्या पावसाळ्य़ात आपण सगळे एकत्र येऊया व अधिकाधिक झाडे लावूया. समाजाच्या विविध घटकांच्या सहभागाने विविध ठिकाणी झाडे लावली जावीत. मी वन खात्याला जुलै ते सप्टेंबरच्या कालावधीत वनमहोत्सव साजरा करण्यासाठी सखोल अशी योजना तयार करण्यास सांगितले आहे. झाडे लावण्यासाठी जागा निवडण्याच्या हेतूने प्रत्येक आमदाराने वन खात्याला मार्गदर्शन करावे. उद्याने, बाग-बगिचे, हायस्कुल, महाविद्याले आदी ठिकाणी झाडे लावता येतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. लोकांच्या निवडीनुसार लोकांना व संस्थांना वन खाते रोपटी उपलब्ध करून देईल. या उपक्रमामुळे गोव्याचे हरित क्षेत्र अबाधित राहिल. आमदारांनी अधिक माहितीसाठी मुख्य वनपाल सुभाष चंद्रा यांच्याशी संपर्क साधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.