शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

१३ हजार कृषी जमीन पडीक कृषीखात्याचा अहवाल जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 21:18 IST

राज्यात एकूण १३४८० हेक्टर शेत जमीन ही लागवडीशिवाय पडून असल्याचे कृषी खात्याच्या अहवालात म्हटले आहे. कृषी खात्याने पडीक जमिनीचे सर्व्हेक्षण करून तयार केलेल्या अहवालाचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. 

पणजी: राज्यात एकूण १३४८० हेक्टर शेत जमीन ही लागवडीशिवाय पडून असल्याचे कृषी खात्याच्या अहवालात म्हटले आहे. कृषी खात्याने पडीक जमिनीचे सर्व्हेक्षण करून तयार केलेल्या अहवालाचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. राज्यातील पडीक शेतजमीन लागवडीखाली आणायची असेल तर त्यासाठी अशा जमिनीची माहिती आवश्यक असल्यामुळे पडीक जमिनीचे सर्व्हेक्षण खात्याकडून हाती घेण्यात आले होते. सर्व्हेक्षण करताना एकूण जमिनीचे दोन विभाग करण्यात आले आहेत. पूर्वेकडील सह्याद्री विभाग आणि पश्चिमेकडील किनारी विभाग. या दोन्ही विभागात मोठ्या प्रमाणावर पडीक जमीन असल्याचे अहवालात म्हटले आहे. या १३४८० पडीक जमिनीपैकी येत्या काही वर्षात तीन चार हजार हेक्टर मीटर जमीन तरी लागवडीखाली आणण्याचे लक्ष्य खात्याने निश्चित करावे अशी सूचना मंत्री सरदेसाई यांनी केली. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टीसाठी सरकारकडून सहकार्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले. जनावरे शेतींची नाशधूस करीत असल्यामुळे त्यांना  उपद्रवी प्राणी ठरविण्याचा प्रस्ताव आहे का असे विचारले असा त्यांनी हा केवळ एका कृषीखात्याच्या अखत्यारीतील विषय नाही. त्यामुळे यावर व्यापक बैठक घेवून विचार केला जाईल. विशेषत: गव्या रेड्यांकडून शेतभातीची होत असलेली प्रचंढ हानी हा चिंतेचा विषय आहे. गव्याना उपद्रवी ठरविण्याच्या बाबतीत चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले. यंदा जनावरांनी शेतीची नासाडी केल्यामुळे नुकसान भरपाईसाठी  ४ हजाराहून अधिक शेतक-यांनी अर्ज केले अस ल्याची माहिती कृषी संचालक नेल्सन फिग्रेडो यांनी दिली.

टॅग्स :goaगोवा