शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार कृषी जमीन पडीक कृषीखात्याचा अहवाल जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 21:18 IST

राज्यात एकूण १३४८० हेक्टर शेत जमीन ही लागवडीशिवाय पडून असल्याचे कृषी खात्याच्या अहवालात म्हटले आहे. कृषी खात्याने पडीक जमिनीचे सर्व्हेक्षण करून तयार केलेल्या अहवालाचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. 

पणजी: राज्यात एकूण १३४८० हेक्टर शेत जमीन ही लागवडीशिवाय पडून असल्याचे कृषी खात्याच्या अहवालात म्हटले आहे. कृषी खात्याने पडीक जमिनीचे सर्व्हेक्षण करून तयार केलेल्या अहवालाचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. राज्यातील पडीक शेतजमीन लागवडीखाली आणायची असेल तर त्यासाठी अशा जमिनीची माहिती आवश्यक असल्यामुळे पडीक जमिनीचे सर्व्हेक्षण खात्याकडून हाती घेण्यात आले होते. सर्व्हेक्षण करताना एकूण जमिनीचे दोन विभाग करण्यात आले आहेत. पूर्वेकडील सह्याद्री विभाग आणि पश्चिमेकडील किनारी विभाग. या दोन्ही विभागात मोठ्या प्रमाणावर पडीक जमीन असल्याचे अहवालात म्हटले आहे. या १३४८० पडीक जमिनीपैकी येत्या काही वर्षात तीन चार हजार हेक्टर मीटर जमीन तरी लागवडीखाली आणण्याचे लक्ष्य खात्याने निश्चित करावे अशी सूचना मंत्री सरदेसाई यांनी केली. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टीसाठी सरकारकडून सहकार्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले. जनावरे शेतींची नाशधूस करीत असल्यामुळे त्यांना  उपद्रवी प्राणी ठरविण्याचा प्रस्ताव आहे का असे विचारले असा त्यांनी हा केवळ एका कृषीखात्याच्या अखत्यारीतील विषय नाही. त्यामुळे यावर व्यापक बैठक घेवून विचार केला जाईल. विशेषत: गव्या रेड्यांकडून शेतभातीची होत असलेली प्रचंढ हानी हा चिंतेचा विषय आहे. गव्याना उपद्रवी ठरविण्याच्या बाबतीत चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले. यंदा जनावरांनी शेतीची नासाडी केल्यामुळे नुकसान भरपाईसाठी  ४ हजाराहून अधिक शेतक-यांनी अर्ज केले अस ल्याची माहिती कृषी संचालक नेल्सन फिग्रेडो यांनी दिली.

टॅग्स :goaगोवा