शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

राष्ट्रीय स्पर्धा होईपर्यंत गोव्याला मिळणार तिळारीचे पाणी; दुरुस्तीकाम पुढे ढकलले

By वासुदेव.पागी | Updated: October 14, 2023 18:07 IST

हे दुरुस्तीकाम पुढे ढकलण्याची मागणी गोवा सरकारने केली होती. 

वासुदेव पागी, पणजी : दुरुस्तीसाठी तिळारी धरणातून बंद करण्यात आलेला पाणी पुरवठा गोव्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गोव्याच्या विनंती नंतर महाराष्ट्र सरकारने दुरुस्तीकामे क्रीडास्पर्धेनंतर हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तिळारी कालवा दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गोव्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे.  दरुस्तीचे काम हे १५ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येणार होते. पंतु गोव्यात राष्ट्रीयस्पर्धा २६ ऑक्टोबरपासून सुरू  होत असल्यामुळे हे दुरुस्तीकाम पुढे ढकलण्याची मागणी गोवा सरकारने केली होती. 

महाराष्ट्राच्या हद्दीतील तिळारीच्या कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे या कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पाऊस संपल्यावर लवकरच हे काम हाती घेण्याचा निर्णय झाला होता. दुरुस्ती कामाचा खर्च हा गोवा आणि महाराष्ट्र संयुक्तपणे करणार आहे. या कालव्यातून होणारा पाणी पुरवठा हा गोव्याला अधिक प्रमाणात होत असल्यामुळे ७५टक्के खर्च हा गोवा सरकारने करण्याचे ठरले आहे. यंदा मान्सून्ला उशीर झाल्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली होती. तिळारीचे पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध जाल्यास उत्तर गोव्यात पाणी पुरवठा करण्यासाठी सोयीस्कर ठरते.

टॅग्स :goaगोवा