शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

विकृती काढून समाजात मानवता वाढवूया

By admin | Updated: March 1, 2015 02:31 IST

फोंडा : प्रणाम सागर एक फुलाची पाकळी होऊन गोवा एक संस्कारक्षम राज्य होण्यासाठी बीजारोपण करण्यासाठी आले असून गोवा एक सुंदर संस्कारक्षम राज्य करूनच जाणार आहेत,

फोंडा : प्रणाम सागर एक फुलाची पाकळी होऊन गोवा एक संस्कारक्षम राज्य होण्यासाठी बीजारोपण करण्यासाठी आले असून गोवा एक सुंदर संस्कारक्षम राज्य करूनच जाणार आहेत, असे प्रतिपादन जैन धर्माचे डॉ. मुनीश्री प्रणाम सागरजी महाराज यांनी शनिवारी येथे केले. समाजातील विकृती काढून टाकण्याचे आणि मानवता वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले. जैन धर्माचे प्रणाम सागर महाराज यांचे बिहार येथून चेन्नई, पाँडिचेरी, बंगळुरू, धर्मस्थळ, कारकल या भागातून गोव्यात आगमन झाले आहे. फोंडा जैन मंडळ व गोवा जैन मंडळ याच्यातर्फे चंद्रकांत भोजे पाटील यांनी आयोजिलेल्या कुर्टी-फोंडा येथील प्रवचन सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, मी दिगंबर बनूनच इकडे आलोय तो सर्व संप्रदायातील लोकांना एकत्र करून भक्तीच्या मार्गावर पोहचविण्यासाठी. मी प्रकृतीबरोबर चालणारा माणूस. समाजातील विकृती काढून टाकायला पाहिजे. माझे एकच घोषवाक्य आहे तेही ‘मानवता.’ जसे सागरात कितीही घाण टाकली तरीही सागर गलिच्छ होत नाही तसेच हा सागर कुठल्याही संप्रदायाचा नाही. तो एक संत बनून सर्वांना एकत्र करून परमात्म्याला भेटायला घेऊन जायला आलाय. ते म्हणाले की, गोव्यात जैन संत म्हणून पहिल्यांदाच आपण आलो आहे. यापूर्वी कुणी तसा आला नव्हता. गोव्यात भगवान महावीर उद्यान आहे, ही चांगली गोष्ट आहे. हे उद्यान महावीरांच्या नावाने मुद्दाम तयार करण्यात आले आहे; कारण सर्व पशुपक्षी त्यामध्ये गुण्यागोविंदाने नांदत असतात. जसे वाघ आणि गाय एकत्र येऊन पाणी पितात, तसेच गोव्यातील लोक एकत्र राहातात. गोव्यात नक्षत्र उद्यान व्हायला हवे. गोव्यातील लोक चिंतेत असतात. त्या उद्यानात गेल्यावर सर्वांची चिंता मिटेल. त्यामुळे गोव्यात आयुर्वेदिक औषधे मिळतात, असे बाहेरील राज्यातील लोकांना वाटेल. मग लोक समुद्रावर न जाता त्या नक्षत्र उद्यानात आपली चिंता मिटविण्यासाठी येऊ लागतील. मुनींच्या तीन निशाणी आहेत. मोर, कमळ आणि वाघ, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, महावीर म्हणजे म-मुस्लीम, ह-हिंदू, वी-सिख, र-इसाई. जैन समाज या सगळ्यांना एकत्र करतो व एक भारत निर्माण करण्याचा व एकतेचा संदेश देतो. ते म्हणाले, गोव्यात धन खूप आहे; पण ते सांभाळणारे मरण, आत्महत्या असल्या विचारात गुंतलेले असतात. एक आई जेव्हा मुलाला कुराण वाचून दाखवते तेव्हा तो आपण मुस्लिम समजतो. जेव्हा गायत्री मंत्र म्हणते, तेव्हा तो आपण हिंदू समजतो. जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा तो मंत्र विसरतो आणि धनाच्या लालसेत राहातो. मग तो डॉक्टर, इंजिनिअर होणार, असे सांगतो; पण मी हिंदू म्हणून सांगत नाही. आई मुलांना संस्कार देते; पण ती लहानपणीच त्यांना सांगते की, तू डॉक्टर, इंजिनिअर हो. मोठेपणी मुलाच्या मनात तेच विचार घोळत राहातात व तो धनाच्या मागे लागतो. माणूस जन्मापासून बनत नाही, तर तो कर्मापासून बनतो. संस्कारच त्याची जडणघडण करतात. मी प्राकृतिक संघर्षातून आलो आहे. मी ड्रेस घालत नाही. जर मी भगवे कपडे घातले, तर हिंदूच माझ्याकडे येणार, हिरवे घातले तर मुस्लिम येणार व पांढरे घातले तर सिख, इसाईच येणार म्हणून मला कुठल्याच धर्मात अडकून पडायचे नाही, असे ते म्हणाले. सुरुवातीला शनिवारी सकाळी ९ वाजता कुर्टी येथील सावित्री सभागृहाजवळून प्रणाम सागर महाराज यांची मिरवणूक निघून ही शोभायात्रा कुर्टी येथील कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ पोचल्यानंतर तेथे उभारण्यात आलेल्या शामियान्यात सर्व संप्रदायाकडून मंगल आशीर्वाद स्वीकारण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता प्रणाम सागर महाराज यांचा सत्संगाचा व प्रवचनाचा कार्यक्रम झाला. जैन धर्माचे गुरू असलेले प्रणाम सागर महाराज यांचे पहिल्यांदाच गोव्यात आगमन होत असल्याने त्यांचे जय्यत स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)